शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक रोखे घोटाळ्यात विशेष सरकारी वकील नियुक्तीतील तत्परता आश्चर्यकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य सरकारने एकीकडे मुख्य जिल्हा सरकारी वकिलाचे रिक्त पद ऑक्टोबर-२०२० पासून भरले नाही आणि दुसरीकडे नागपूर जिल्हा ...

नागपूर : राज्य सरकारने एकीकडे मुख्य जिल्हा सरकारी वकिलाचे रिक्त पद ऑक्टोबर-२०२० पासून भरले नाही आणि दुसरीकडे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर तातडीने अ‍ॅड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती केली. सरकारच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामागे सरकारचा उद्देश काय, असा प्रश्नही विचारला जात आहे.

रोखे घोटाळा प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार हे मुख्य आरोपी आहेत तर, अ‍ॅड. आसिफ कुरेशी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी, मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष आहेत. असे असताना सरकारने त्यांच्याकडे घोटाळ्याचा खटला चालवण्याची जबाबदारी सोपवली आहे. अ‍ॅड. वजानी यांनी गेल्या ५ मार्च रोजी राजीनामा दिला. त्यानंतर सरकारने १४ मे रोजी अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली. तेव्हापासून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुख्य जिल्हा सरकारी वकिलाचे महत्त्वपूर्ण पद सहा महिन्यापासून रिक्त ठेवणाऱ्या सरकारने अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीत एवढी तत्परता का दाखवली, याचे उत्तर अनेक जम मागत आहेत.

---------------

उद्देश पारदर्शक नाही

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळ्यासंदर्भातील जनहित याचिकेचे कामकाज पाहत असलेले अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी राज्य सरकारचा अ‍ॅड. आसिफ कुरेशी यांच्या नियुक्तीमागील उद्देश पारदर्शक नसल्याचे दिसून येते, असा आरोप केला. या घोटाळ्यामध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे ही नियुक्ती तातडीने करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.