शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

क्रिप्टो करन्सी घोटाळ्याचा प्रमोटर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणारा ईथर ट्रेड एशियाचा प्रमोटर राजपाल सिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणारा ईथर ट्रेड एशियाचा प्रमोटर राजपाल सिंग याच्या अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने शनिवारी मुसक्या बांधल्या. त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलिसांनी ३० जूनपर्यंत कस्टडी मिळवली.

या घोटाळ्याचा सूत्रधार निषेध आणि त्याची पत्नी प्रगती वासनिक यांनी श्रीकांत जिव्हाळ, राजेंद्र खोब्रागडे, गजानन भोलेनाथ मुंगले, राजपाल सिंग आणि संदेश लांजेवार यांच्या मदतीने सक्करदऱ्यात ईथर ट्रेड एशियाचे कार्यालय थाटले होते. प्रत्येक दिवसाला बोनस आणि १०० दिवसात दुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून या टोळीने ४ ते ५ हजार गुंतवणूकदारांची २०० कोटींपेक्षा जास्त रक्कम हडपली. प्रारंभी नागपुरातील गुंतवणूकदारांना १०० दिवसात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आकर्षित केल्यानंतर त्यांनी वर्धा, भंडारा, मुंबईसह ठिकठिकाणी आपले नेटवर्क पसरवले. गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनारचे आयोजन केले जायचे. ती सर्व जबाबदारी राजपालसिंग सांभाळत होता. त्यातून ४ ते ५ हजार गुंतवणूकदारांना आकर्षित करून वासनिक दाम्पत्य आणि त्याच्या टोळीने सुमारे २०० कोटी रुपये गोळा केले आणि गाशा गुंडाळून पळून गेले. १०० दिवसांची मुदत संपल्यानंतर आपली रक्कम परत मागण्यास आलेल्या गुंतवणूकदारांना आरोपींचे कार्यालय कुलूपबंद दिसल्याने एकच खळबळ उडाली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणात १७ एप्रिलला गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर करीत आहेत.

---

लपत छपत फिरत होता राजपाल

या प्रकरणात पोलिसांनी आतापावेतो खोब्रागडे आणि जिव्हाळला अटक केली तर राजपालच्या रुपातील ही तिसरी अटक आहे. आतापर्यंत राजपाल लपत छपत वेगवेगळ्या भागात राहत होता. शनिवारी राजपाल अमरनगर गोधनी भागात आल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.

फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

विविध राज्यात अनेकांना गंडा

पोलिसांच्या आजवरच्या तपासात नागपूर- महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गुंतवणूकदारांनाही या टोळीने गंडा घातला आहे. फसगत झालेल्यांचा आकडा ४ ते ५ हजारांच्या घरात आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांकडे केवळ १२५ जणांनीच तक्रार दिली आहे. या तक्रारदारांची एकूण रक्कम २ ते २.५ कोटी एवढी आहे. फसगत झालेल्यांनी गुन्हे शाखेत तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

----