शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

प्रकल्पग्रस्तांनी रेशीम उद्योगाकडे वळावे

By admin | Updated: August 27, 2014 00:56 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून रेशीम उद्योगाचा पर्याय तपासून पाहावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेत करण्यात आले.

गोसेखुर्द : कार्यशाळेतून दिली अधिकाऱ्यांनी माहितीनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून रेशीम उद्योगाचा पर्याय तपासून पाहावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेत करण्यात आले.कार्यशाळेत वनबलप्रमुख अनिलकुमार सक्सेना, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अतिरिक्त आयुक्त (आदिवासी) पल्लवी दराडे, भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, केंद्रीय रेशीम मंडळाचे माजी संचालक डॉ. एस.एच.एम. काद्री, डॉ. दीपक बारसागडे आदींनी शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती दिली.देशात मागणीच्या तुलनेत रेशीम उत्पादन कमी असल्याने त्याला बाजारभाव अधिक आहे. शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उत्पादनात वाढ करावी. शासनाच्या रेशीम उद्योग संचालनालय आणि वस्त्रोद्योग खात्यामार्फत यासाठी विविध योजना राबविल्या जातात; त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे यावेळी सांगण्यात आले.पूर्व विभागातील चार जिल्ह्यांत रेशीम विभागाचे ११०० हेक्टर तर वन विभागाच्या १७,००० हजार हेक्टर वनक्षेत्रावर टसर कीटक संगोपन केले जाते. एक हेक्टरमध्ये एका वर्षात तीनवेळा नियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्यास ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना होऊ शकते. भंडारा जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढल्यास त्यापासून साड्या तयार केल्या जाऊ शकतात व बाजारपेठेत या जिल्ह्याचे नाव होऊ शकते, कमी भांडवलात अधिक नफा मिळवून देणारा हा उद्योग असल्याने शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे एक चांगले साधन होऊ शकते, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार म्हणाले.रेशमापासून फक्त कापडच नव्हे तर औषध, कॉस्मेटिक वस्तूही निर्माण करता येतात. या उत्पादनाला बाजारात मागणी आहे. प्रकल्पग्रस्तांनी या उद्योगात पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. काद्री यांनी केले.मानवी गरजा वाढल्या असल्याने त्या भागविण्यासाठी उत्पादन वाढीची पूरक साधने शोधणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यासाठी रेशीम उद्योग एक चांगला पर्याय आहे, असे डॉ. माधवी खोडे म्हणाल्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. संचालन सहायक आयुक्त राजलक्ष्मी शहा यांनी केले. (प्रतिनिधी)