शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीचे प्रतिबंधित बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : कृषी विभागाच्या भरारी व नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कळमेश्वर पाेलीस ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : कृषी विभागाच्या भरारी व नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर-माेहपा-सावनेर मार्गावर कारवाई करीत या प्रतिबंधित बियाण्यांच्या पॅकेटची वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून बियाण्यांचे पॅकेट व कार असा एकूण ११ लाख १५ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

शेषराव नागेश नारनवरे रा. वडविहिरा, ता. काटोल असे अटक करण्यात आलेल्या आराेपी कारचालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कृषी विभागाचे भरारी पथक कळमेश्वर परिसरात गस्तीवर हाेते. त्यातच त्यांना सावनेरहून कळमेश्वरच्या दिशेने कपाशीच्या एचटीबीटी बियाण्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावरून जाणाऱ्या हलक्या वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.

त्यांनी एमच-४०/बीजे-८७८६ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. त्या कारमध्ये त्यांना प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांचे पॅकेट आढळून येताच त्यांची कारचालक शेषराव नारनवरे यांस अटक करीत त्याच्याकडून कार व बियाण्याचे पॅकेट ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये १ लाख १५ हजार ५० रुपये किमतीचे प्रतिबंधित बियाण्यांचे १५० पॅकेट आणि १० लाख रुपयांची कार असा एकूण ११ लाख १५ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.

याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून भादंवि ४२०, ४१७, ४६८, बियाणे नियंत्रण कायदा ७ (ए, बी, सी), १४, पर्यावरण संरक्षण कायदा सहकलम १५ (१) (२), १६ (१) (२) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, सहायक फाैजदार जयप्रकाश शर्मा, दिनेश अधापुरे, राजू रेवतकर, वीरेंद्र नरड, विपीन गायधने, महेश बिसने, भाऊराव खंडाते, कृषी विभागाचे उमाकांत हतागळे, दीपक जंगले, राकेश वासू व युवराज सेवतकर यांच्या पथकाने केली.

...

निंदणाचा खर्च कमी

केंद्र शासनाने कपाशीच्या एचटीबीटी वाणावर प्रतिबंध घातला असला तरी निंदणाचा खर्च कमी हाेत असल्याने शेतकरी या वाणाला प्राधान्य देत आहे. पावसाळ्यात निंदणाला मजूर मिळत नसल्याने तसेच वाढीव मजुरी द्यावी लागत असल्याने कापसाचा उत्पादन खर्च वाढताे. वेळीच निंदण न केल्यास उत्पादन कमी हाेण्याची शक्यता असते. कपाशीच्या एचटीबीटी वाणावर तणनाशकाची फवारणी केल्यास निंदणाचा खर्च कमी हाेत असल्याने आपण हे वाण वापरत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी खासगीत दिली. तणनाशकाचा प्रतिकार करणारी काही पिकांच्या बियाण्यांवर शासनाने बंदी घातली नाही. मग कपाशीच्या बियाण्यांवर बंदी का घातली, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.