शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

समाजाची प्रगती आरक्षणातून नव्हे तर नवी दृष्टी देण्यातून : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:36 IST

समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देमाळी समाजाचे महाअधिवेशन, फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात अखिल माळी समाज महाअधिवेशन पार पडले. त्या उद्घाटनप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कृष्णकांत इंगळे, माजी आमदार वसंतराव मालदुरे, डॉ. केशवराव यावलकर, माजी आमदार अशोक मानकर, संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब चिकाटे, शेषराव उमप, प्रकाश मौर्य, अशोक मानकर, संस्थाध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, महापुरुष कुण्या एका समाजाचे नसतात. त्यांचे अनुकरण संपूर्ण समाज करीत असतो. सामाजिक संघटनांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे. सामाजिक विकासाच्या संकल्पनेची त्रिसूत्री त्यांनी मांडली. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास यातून समाजाने मोठे व्हावे. समाजाच्या विकासासाठी समाजातील माणसांनी पुढे यावे. जात महत्त्वाची नसून व्यक्तीचे काम महत्त्वाचे असते. येत्या काळामध्ये ज्ञान ही मोठी शक्ती राहणार आहे, त्यामुळे महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करा, असे आवाहन त्यांनी केले.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले, समाजाची एकजूट महत्त्वाची असते. कोणतेही सामाजिक कार्य एकजुटीतूनच सफल होते. नागपुरातील माळी समाजाच्या मेळाव्यातून एकजुटीचा प्रत्यय आल्याचे सांगून त्यांनी या आयोजनाचे कौतुक केले. सध्या निवडणुकीचा काळ असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. समाजाच्या विकासासाठी हे आवश्यक असले तरी आपली मूल्ये आणि समाजपुरुषांची शिकवण कायम राखण्याची गरज आहे.प्रास्ताविकातून प्रा. अरुण पवार यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची गरज असून समाजाच्या एकसंघतेचीही अपेक्षा व्यक्त केली. महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध मागण्याही त्यांनी मांडल्या. यावेळी माजी आमदार वसंतराव मालदुरे, बाळासाहेब शिवरकर, प्रकाश मौर्य आदींची भाषणे झाली. डॉ. केशवराव यावलकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाअधिवेशनाला महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcommunityसमाज