शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

समाजाची प्रगती आरक्षणातून नव्हे तर नवी दृष्टी देण्यातून : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:36 IST

समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देमाळी समाजाचे महाअधिवेशन, फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात अखिल माळी समाज महाअधिवेशन पार पडले. त्या उद्घाटनप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कृष्णकांत इंगळे, माजी आमदार वसंतराव मालदुरे, डॉ. केशवराव यावलकर, माजी आमदार अशोक मानकर, संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब चिकाटे, शेषराव उमप, प्रकाश मौर्य, अशोक मानकर, संस्थाध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, महापुरुष कुण्या एका समाजाचे नसतात. त्यांचे अनुकरण संपूर्ण समाज करीत असतो. सामाजिक संघटनांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे. सामाजिक विकासाच्या संकल्पनेची त्रिसूत्री त्यांनी मांडली. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास यातून समाजाने मोठे व्हावे. समाजाच्या विकासासाठी समाजातील माणसांनी पुढे यावे. जात महत्त्वाची नसून व्यक्तीचे काम महत्त्वाचे असते. येत्या काळामध्ये ज्ञान ही मोठी शक्ती राहणार आहे, त्यामुळे महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करा, असे आवाहन त्यांनी केले.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले, समाजाची एकजूट महत्त्वाची असते. कोणतेही सामाजिक कार्य एकजुटीतूनच सफल होते. नागपुरातील माळी समाजाच्या मेळाव्यातून एकजुटीचा प्रत्यय आल्याचे सांगून त्यांनी या आयोजनाचे कौतुक केले. सध्या निवडणुकीचा काळ असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. समाजाच्या विकासासाठी हे आवश्यक असले तरी आपली मूल्ये आणि समाजपुरुषांची शिकवण कायम राखण्याची गरज आहे.प्रास्ताविकातून प्रा. अरुण पवार यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची गरज असून समाजाच्या एकसंघतेचीही अपेक्षा व्यक्त केली. महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध मागण्याही त्यांनी मांडल्या. यावेळी माजी आमदार वसंतराव मालदुरे, बाळासाहेब शिवरकर, प्रकाश मौर्य आदींची भाषणे झाली. डॉ. केशवराव यावलकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाअधिवेशनाला महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcommunityसमाज