शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

खासगी प्रवासी वाहनांचे पार्किंग नागपूर शहराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:05 IST

अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : अमरावती व वर्धा रोडवर स्वतंत्र व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, फेरीवाले यासह विविध समस्यांवर उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. न्यायालयाने या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये सर्वच संबंधित विभागाचे उच्चाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या समितीने स्थानिकस्तरावर आवश्यक निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. उपसमितीच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.सात हजारांवर पालकांनी दिले प्रतिज्ञापत्रअल्पवयीन मुलामुलींना ५० सीसीवरील दुचाक्या चालविण्याची परवानगी नाही. परंतु, हा नियम कागदावरच आहे. अल्पवयीन मुले-मुली सर्रास शक्तिशाली दुचाक्या चालवित आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी न्यायालयाने अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून त्यांची अपत्ये शक्तिशाली दुचाक्या चालविणार नाहीत व चालविल्यास कोणत्याही दुर्घटनेस पालक जबाबदार राहतील असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सात हजारावर पालकांकडून असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.शहरात ५६९ अवैध गोठेदुग्ध विकास विभागाचे अधिकाºयांनी सर्वेक्षण केले असता शहरामध्ये ५६९ अवैध गोठे आढळून आलेत. त्यापैकी २०० गोठ्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित गोठ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध गोठ्यांमुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दूध काढणे झाल्यानंतर जनावरांना मोकाट सोडले जाते. त्यामुळे जनावरे रोडवर जाऊन बसतात. त्यातून वाहतूक कोंडी होते. अपघात घडतात. समस्या मुळासकट संपविण्याकरिता अवैध गोठे शोधून काढण्यासाठी नगरसेवकांची मदत घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTravelप्रवास