शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

खासगी प्रवासी वाहनांचे पार्किंग नागपूर शहराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:05 IST

अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : अमरावती व वर्धा रोडवर स्वतंत्र व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, फेरीवाले यासह विविध समस्यांवर उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. न्यायालयाने या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये सर्वच संबंधित विभागाचे उच्चाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या समितीने स्थानिकस्तरावर आवश्यक निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. उपसमितीच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.सात हजारांवर पालकांनी दिले प्रतिज्ञापत्रअल्पवयीन मुलामुलींना ५० सीसीवरील दुचाक्या चालविण्याची परवानगी नाही. परंतु, हा नियम कागदावरच आहे. अल्पवयीन मुले-मुली सर्रास शक्तिशाली दुचाक्या चालवित आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी न्यायालयाने अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून त्यांची अपत्ये शक्तिशाली दुचाक्या चालविणार नाहीत व चालविल्यास कोणत्याही दुर्घटनेस पालक जबाबदार राहतील असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सात हजारावर पालकांकडून असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.शहरात ५६९ अवैध गोठेदुग्ध विकास विभागाचे अधिकाºयांनी सर्वेक्षण केले असता शहरामध्ये ५६९ अवैध गोठे आढळून आलेत. त्यापैकी २०० गोठ्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित गोठ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध गोठ्यांमुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दूध काढणे झाल्यानंतर जनावरांना मोकाट सोडले जाते. त्यामुळे जनावरे रोडवर जाऊन बसतात. त्यातून वाहतूक कोंडी होते. अपघात घडतात. समस्या मुळासकट संपविण्याकरिता अवैध गोठे शोधून काढण्यासाठी नगरसेवकांची मदत घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTravelप्रवास