शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

पृथ्वीराज चव्हाण निराश, मनमोहन सिंह अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:16 IST

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे मोठे अर्थशास्त्री असले तरी त्यांच्या शासनकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगात नकारात्मक चित्र निर्माण झाले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : काळ्या पैशांविरोधात संघर्ष सुरूच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे मोठे अर्थशास्त्री असले तरी त्यांच्या शासनकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगात नकारात्मक चित्र निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नसले तरी त्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. यामुळे मनमोहन सिंह आश्चर्यचकित झाले आहेत. तर सततच्या पराभवामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निराश आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीच्या विविध मुद्यांवर प्रकाश टाकला.नोटाबंदीनंतरच्या वर्षात विविध अर्थशास्त्री व तज्ज्ञांनी आपापल्यापरीने अभ्यास करून निरीक्षणे मांडली. सामान्य जनता सरकारच्या पाठीशी आहे; मात्र काही राजकीय अर्थशास्त्रांकडून नकारात्मक सूर लावण्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून टीकात्मक वक्तव्ये येत आहेत. मात्र कराडमध्ये त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेली तीन वर्षे हा त्यांच्या करिअरमधला सर्वात पडता काळ आहे. सततच्या पराभवामुळे ते निराश झाले आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. काळ्या पैशांसंदर्भात ‘एसआयटी’बाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनदेखील मागील शासनाने पावले उचलली नव्हती. नोटाबंदीमुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे आणि तेच लोक टीका करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काळ्या पैशांविरोधात शृंखलाबद्ध संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष पुढील काळातदेखील सुरूच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.ग्रामीण भागदेखील होतोय ‘कॅशलेस’नोटाबंदीनंतर ‘कॅशलेस’ व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. नोटाबंदीनंतर ३५० कोटी ‘कॅशलेस’ व्यवहार झाले व यात ६.६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. ग्रामीण भागात या व्यवहारांचे प्रमाण कमी असले तरी, प्रशासकीय यंत्रणा ग्रामीण पातळीवर ‘कॅशलेस’ होत आहे. शहर व ग्रामीण भागातील हा फरक दूर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीमुळे राज्यातील करवसुली वाढल्याचे आकडेवारीसह सांगितले. आॅक्टोबर २०१६ पर्यंत ‘व्हॅट’अंतर्गत उद्दिष्टांपेक्षा ३.५ टक्के कमी वसुली (५२,२२६ कोटी) झाली होती. मात्र नोटाबंदी ते मार्च २०१७ या कालावधीत हाच आकडा ९०,५५२ कोटींवर पोहोचला. नोव्हेंबर ते मे दरम्यान ‘व्हॅट’अंतर्गत ५३ हजार नवीन नोंदणी झाल्या. शिवाय नोटाबंदीनंतर देशात ५६ लाख करदात्यांची संख्या वाढली. २.२४ बोगस कंपन्या बंद झाल्या. तर ४५० कंपन्यांची ‘स्टॉक मार्केट’मधील नोंदणी रद्द झाली. देशात गुंतवणुकीचे प्रमाणदेखील वाढले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नोटाबंदी लागू झाल्यानंतर उद्योगक्षेत्राने काही काळ उत्पादन कमी केले होते. मात्र आता या क्षेत्रात मागणी व उत्पादन दोघांमध्येदेखील वाढ झाली आहे, असेदेखील ते म्हणाले.पेट्रोलियम पदार्थांवर ‘जीएसटी’बाबत विचार करावा लागणार‘पेट्रोल, ‘डिझेल’ तसेच मद्यावर अद्याप ‘जीएसटी’ लावण्यात आलेला नाही. या उत्पादनांपासून राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. ‘जीएसटी’ लागू होऊन फारसा कालावधी झाला नसून विविध राज्यांतील अर्थमंत्र्यांनी याबाबतीत लवचिकता असावी, म्हणून सद्यस्थितीत या उत्पादनांना ‘जीएसटी’च्या बाहेर ठेवण्याची विनंती केली आहे. मात्र पुढील काळात यावर विचार करावा लागणार आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.