शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील कैदी प ळा ला

By admin | Updated: June 16, 2015 02:34 IST

दुपारी २.३० वाजता धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोयर बावाच्या पलायनाची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण

सर्वत्र नाकाबंदीदुपारी २.३० वाजता धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोयर बावाच्या पलायनाची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षातून सर्व पोलीस ठाण्यात अलर्ट देण्यात आला. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. ग्रामीण पोलिसांनाही कळविण्यात आले. भोयर बावाचे छायाचित्र देऊन साऱ्यांना त्याला पकडण्याचे सूचनावजा आदेश देण्यात आले. मात्र वृत्त लिहिस्तोवर आरोपी मिळाला नव्हता. जन्मठेपेचा कैदी : कारागृह प्रशासनाला हादरानागपूर : मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला एक कैदी सोमवारी सकाळी कारागृहाच्या बाहेरून पळून गेला. पुरुषोत्तम भोयर (वय ३९) असे त्या कैद्याचे नाव आहे. अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या ‘जेल ब्रेक’चा थरार ताजाच असताना घडलेल्या या घटनेमुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला भोयर मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. १२ वर्षांपूर्वी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातीलच खुल्या कारागृहात ठेवण्यात आले. गेल्या वर्षभरापासून तो कारागृहाबाहेरच्या परिसरात साफसफाई करून अन्य कैद्यांकडूनही कामे करून घ्यायचा. बाहेर काढण्यात येणाऱ्या कैद्यांवर लक्ष ठेवण्याचीही त्याच्यावर जबाबदारी होती. भोयर ‘बावा’ म्हणून तो कारागृहात ओळखला जात होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी कारागृहात भत्ता घेतल्यानंतर इतर काही कैद्यांसोबत तो बाहेर आला. सोबत काही कर्मचारीही होते. सकाळी १०च्या सुमारास काम आटोपल्याने कैद्यांना आतमध्ये नेण्याची तयारी झाली. भोयर बावा दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. तो पळून गेल्याचे स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांना माहिती दिली. भोयर बावा पळून गेल्याची वार्ता कारागृह प्रशासनाला हादरवून सोडणारी ठरली. इकडे तिकडे शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांना कळविण्यात आले. देसाई यांनी तातडीने अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्रित करून भोयर बावाची माहिती घेतली. धंतोली पोलिसांनाही कळविण्यात आले. अडीच महिन्यात दुसरा धक्का मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला अडीच महिन्यात मिळालेला हा दुसरा धक्का आहे. ३१ मार्चच्या पहाटे कारागृहातून पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी तिघांना पकडले. मुख्य सूत्रधार सत्येंद्र गुप्ता आणि बिशनसिंग उके अद्याप हाती लागलेले नाही. या प्रकरणाने कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक वैभव कांबळे आणि चार तुरुंगाधिकाऱ्यांसह एकूण १० जणांना निलंबित करण्यात आले तर, एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले. यानंतर येथे कारागृह अधीक्षकांसह नवीन १७ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले. नवीन अधिकारी कारागृहातील व्यवस्था नीट करण्याच्या प्रयत्नात असतानाच ही घटना घडल्याने त्यांनाही हादरा बसला आहे. विशेष म्हणजे, आठ महिन्यांपूर्वी असाच मुक्तवावर (बावा) असलेला सूरज अरखेल नावाचा कैदी कारागृहाच्या बाहेरून अशाच प्रकारे पळून गेला होता.