शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

राज्यात जेल टुरिझम २६ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) कारागृहातून त्याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कारागृह पर्यटनाचा (जेल टुरिझम) हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचीही माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील अनेक कारागृहात संबंधित घडामोडींचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जपून ठेवण्यात आले आहेत.

येरवडा, ठाणे, नाशिक, नागपूर कारागृह स्वातंत्र्यलढ्यादरम्यानच्या अनेक घटना, प्रसंगाचे साक्षीदार आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोर मंडळी या कारागृहात राहिली आहेत. ते ज्या ठिकाणी राहिले, त्या कोठड्यांचेही जतन करण्यात आले आहे. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करारही याच कारागृहातील आंब्याच्या झाडाखाली झाला आहे. त्या झाडाचेही जतन करण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, जनरल वैद्य यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा तसेच चाफेकर बंधूंना येरवड्यातच फासावर टांगण्यात आले होते. अशा अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या येरवडा कारागृहाची सर्वांना, खास करून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेल टुरिझमचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येरवडानंतर राज्यातील अन्य कारागृहांतही कारागृह पर्यटन सुरू केले जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

माफक क्षुल्क घेणार

पर्यटक म्हणून ज्यांना कारागृह बघायचे आहे, त्या व्यक्ती, संस्थांना आधी अर्ज करावा लागेल. कारागृहात जाताना खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाइल, कॅमेरा, पाण्याची बाटली अथवा कुठलीच वस्तू आतमध्ये नेता येणार नाही. प्रशासनाकडून फोटो आणि व्हिडीओग्राफीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ते नंतर संबंधितांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंबंधीचे प्रवेश शुल्क शालेय विद्यार्थ्यांसाठी ५, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १०, तर अन्य पर्यटकांना केवळ ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

----

अर्णबविरुद्ध कारवाईसाठी चाचपणी

पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांनी अर्णब गोस्वामीचा मुद्दा उपस्थित केला. बालाकोटमधील हल्ल्याची माहिती अर्णबला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती, असे बारप्रमुख दासगुप्तासोबतच्या चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल का, त्यासंबंधाने कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले. नाईक प्रकरणात अर्णबविरुद्ध कारवाई झाली त्यावेळी भाजप नेत्यांनी त्याचा उघड बचाव केला होता. आता प्रकरण थेट देशाच्या सुरक्षेशीच संबंधित आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी देशमुख यांनी केली.

----