शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

राज्यात जेल टुरिझम २६ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) कारागृहातून त्याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कारागृह पर्यटनाचा (जेल टुरिझम) हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचीही माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील अनेक कारागृहात संबंधित घडामोडींचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जपून ठेवण्यात आले आहेत.

येरवडा, ठाणे, नाशिक, नागपूर कारागृह स्वातंत्र्यलढ्यादरम्यानच्या अनेक घटना, प्रसंगाचे साक्षीदार आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोर मंडळी या कारागृहात राहिली आहेत. ते ज्या ठिकाणी राहिले, त्या कोठड्यांचेही जतन करण्यात आले आहे. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करारही याच कारागृहातील आंब्याच्या झाडाखाली झाला आहे. त्या झाडाचेही जतन करण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, जनरल वैद्य यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा तसेच चाफेकर बंधूंना येरवड्यातच फासावर टांगण्यात आले होते. अशा अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या येरवडा कारागृहाची सर्वांना, खास करून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेल टुरिझमचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येरवडानंतर राज्यातील अन्य कारागृहांतही कारागृह पर्यटन सुरू केले जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

माफक क्षुल्क घेणार

पर्यटक म्हणून ज्यांना कारागृह बघायचे आहे, त्या व्यक्ती, संस्थांना आधी अर्ज करावा लागेल. कारागृहात जाताना खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाइल, कॅमेरा, पाण्याची बाटली अथवा कुठलीच वस्तू आतमध्ये नेता येणार नाही. प्रशासनाकडून फोटो आणि व्हिडीओग्राफीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ते नंतर संबंधितांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंबंधीचे प्रवेश शुल्क शालेय विद्यार्थ्यांसाठी ५, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १०, तर अन्य पर्यटकांना केवळ ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

----

अर्णबविरुद्ध कारवाईसाठी चाचपणी

पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांनी अर्णब गोस्वामीचा मुद्दा उपस्थित केला. बालाकोटमधील हल्ल्याची माहिती अर्णबला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती, असे बारप्रमुख दासगुप्तासोबतच्या चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल का, त्यासंबंधाने कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले. नाईक प्रकरणात अर्णबविरुद्ध कारवाई झाली त्यावेळी भाजप नेत्यांनी त्याचा उघड बचाव केला होता. आता प्रकरण थेट देशाच्या सुरक्षेशीच संबंधित आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी देशमुख यांनी केली.

----