शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

नव्या पिढीत अहिंसेचे तत्त्व रुजवायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:15 IST

वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुंडलिकराव गेडाम यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.नागपूर जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समितीच्यावतीने माजी मंत्री स्व. शंकरराव गेडाम यांच्या जन्मदिनी त्यांचे बंधु स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. पुंडलिकराव गेडाम यांचा भरतनगरातील भास्कर सभागृहात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, सर्वोदय आश्रमाच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, सेवाग्राम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्राचार्य महादेव नगराळे उपस्थित होते. माजी मंत्री हरिभाऊ नाईक म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही देशात सुराज्य निर्माण झाले नसून आजही अनेक प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या, भारत अहिंसेच्या मार्गावर स्वतंत्र झाला आहे. परंतु देशात अहिंसा वाढत असून स्वातंत्र्य सैनिकांनी नव्या पिढीला अहिंसेचा धर्म पटवून देण्याची गरज आहे. उमेश चौबे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी जात-पात न पाहता देश स्वतंत्र केला. परंतु आज देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असून मजुरांचे हक्क हिरावल्या जात आहेत. ही स्थिती बदलविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढण्याची गरज आहे. गेव्ह आवारी म्हणाले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेनुसार भारताची जडणघडण होत आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.धर्माचा प्रचार करून देशाला तोडणाºया शक्ती डोके वर काढत असून त्यांना रोखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. म. गडकरी यांनी जात, धर्म, पंथ सोडून देशातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. हरिभाऊ केदार यांनी समाजातील तळागाळातील माणूस हे सर्वांचे लक्ष्य असले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी आमदार यादवराव देवगडे यांनी केले. संचालन सुधा पावडे यांनी केले. आभार हरिभाऊ उमरकर यांनी मानले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.