शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पिढीत अहिंसेचे तत्त्व रुजवायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:15 IST

वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुंडलिकराव गेडाम यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.नागपूर जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समितीच्यावतीने माजी मंत्री स्व. शंकरराव गेडाम यांच्या जन्मदिनी त्यांचे बंधु स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. पुंडलिकराव गेडाम यांचा भरतनगरातील भास्कर सभागृहात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, सर्वोदय आश्रमाच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, सेवाग्राम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्राचार्य महादेव नगराळे उपस्थित होते. माजी मंत्री हरिभाऊ नाईक म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही देशात सुराज्य निर्माण झाले नसून आजही अनेक प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या, भारत अहिंसेच्या मार्गावर स्वतंत्र झाला आहे. परंतु देशात अहिंसा वाढत असून स्वातंत्र्य सैनिकांनी नव्या पिढीला अहिंसेचा धर्म पटवून देण्याची गरज आहे. उमेश चौबे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी जात-पात न पाहता देश स्वतंत्र केला. परंतु आज देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असून मजुरांचे हक्क हिरावल्या जात आहेत. ही स्थिती बदलविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढण्याची गरज आहे. गेव्ह आवारी म्हणाले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेनुसार भारताची जडणघडण होत आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.धर्माचा प्रचार करून देशाला तोडणाºया शक्ती डोके वर काढत असून त्यांना रोखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. म. गडकरी यांनी जात, धर्म, पंथ सोडून देशातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. हरिभाऊ केदार यांनी समाजातील तळागाळातील माणूस हे सर्वांचे लक्ष्य असले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी आमदार यादवराव देवगडे यांनी केले. संचालन सुधा पावडे यांनी केले. आभार हरिभाऊ उमरकर यांनी मानले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.