शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

नव्या पिढीत अहिंसेचे तत्त्व रुजवायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:15 IST

वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुंडलिकराव गेडाम यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.नागपूर जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समितीच्यावतीने माजी मंत्री स्व. शंकरराव गेडाम यांच्या जन्मदिनी त्यांचे बंधु स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. पुंडलिकराव गेडाम यांचा भरतनगरातील भास्कर सभागृहात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, सर्वोदय आश्रमाच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, सेवाग्राम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्राचार्य महादेव नगराळे उपस्थित होते. माजी मंत्री हरिभाऊ नाईक म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही देशात सुराज्य निर्माण झाले नसून आजही अनेक प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या, भारत अहिंसेच्या मार्गावर स्वतंत्र झाला आहे. परंतु देशात अहिंसा वाढत असून स्वातंत्र्य सैनिकांनी नव्या पिढीला अहिंसेचा धर्म पटवून देण्याची गरज आहे. उमेश चौबे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी जात-पात न पाहता देश स्वतंत्र केला. परंतु आज देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असून मजुरांचे हक्क हिरावल्या जात आहेत. ही स्थिती बदलविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढण्याची गरज आहे. गेव्ह आवारी म्हणाले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेनुसार भारताची जडणघडण होत आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.धर्माचा प्रचार करून देशाला तोडणाºया शक्ती डोके वर काढत असून त्यांना रोखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. म. गडकरी यांनी जात, धर्म, पंथ सोडून देशातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. हरिभाऊ केदार यांनी समाजातील तळागाळातील माणूस हे सर्वांचे लक्ष्य असले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी आमदार यादवराव देवगडे यांनी केले. संचालन सुधा पावडे यांनी केले. आभार हरिभाऊ उमरकर यांनी मानले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.