शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

पंतप्रधानांचे विदेश दौरे फायद्याचेच

By admin | Updated: September 27, 2015 02:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका कानावर पडते.

राहुल बजाज : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावीनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे. विविध करारांमधून विदेशी गुंतवणूक देशात येण्यासंदर्भातील मार्ग मोकळे होत आहेत, या शब्दात प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी यांच्या कार्यप्रणालीला ‘अ’ दर्जा दिला आहे. काही आठवड्यांपूर्वी बजाज यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती, हे विशेष.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला सोहळ्याला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकास लगेच होत नसतो. त्यामुळे ‘अच्छे दिन’ लगेच येणार नाहीत. गेल्या १६ महिन्यांत केंद्र सरकारकडून आश्वासक कामगिरी झाली आहे. उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे व हे देशासाठी सकारात्मक संकेत आहेत. १६ महिन्यांत सरकारच्या कामकाजाचे मूल्यांकन करणे योग्य होणार नाही. त्यामुळे वेळ दिला पाहिजे, असे मत बजाज यांनी व्यक्त केले. केंद्र शासनातील बहुतांश मंत्री चांगले काम करीत आहेत. परंतु मंत्रिमंडळात काही फेरबदल आवश्यक वाटत असून, बिहार विधानसभा निवडणुकानंतर नव्या व अभ्यासू चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. १९९० नंतर मुंबईत काही उद्योगपतींनी एकत्र येत देशातील उद्योगांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. पंतप्रधानांचा ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम हे त्याचेच स्वरूप असल्याचे बजाज यांनी सांगितले.‘जीएसटी’साठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावेदेशाच्या उद्योगक्षेत्राचा विकास लक्षात घेता ‘जीएसटी’ (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. देशहित लक्षात घेता विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘संपुआ’च्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) काळात ‘जीएसटी’ला ‘रालोआ’ने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) विरोध केला होता. आता ‘संपुआ’कडून विरोध करण्यात येत आहे. देशाला विकास अपेक्षित आहे. त्यामुळे चांगल्या कामांसाठी राजकारण दूर सारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.(प्रतिनिधी)