शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:34 IST

एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे.

नागपूर, दि.2 - एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भुमिका घेतली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांकडे चर्चेसाठी वेळदेखील मागण्यात आली आहे. सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना तसेच  घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेत आॅगस्टमध्ये देशभरात संघ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. विदर्भात ५ ते २० ऑगस्टदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे संघाचे स्वयंसेवकच सत्तास्थानी असलेल्या नेत्यांनी नागपूर मेट्रोच्या ६९ डब्यांचे ८५१ कोटी रुपयांचे कंत्राट चक्क चीनच्या कंपनीला दिले आहेत. ही दुर्दैवी बाब असून आम्ही सुरुवातीपासून याचा विरोध करत आहोत. देशातच हे डबे बनू द्या, अशी विनंती आम्ही अधिकारी, मंत्र्यांना केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता पंतप्रधानांकडेच दाद मागितली असल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे अखिल भारतीय प्रमुख अजय पत्की यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली.  यावेळी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान समितीचे विदर्भ संयोजक सुभाष लोहे, उपाध्यक्ष दादाजी उके, सहसंयोजक माधव गोडसे, कर्नल (सेवानिवृत्त) अभय पटवर्धन, कॅप्टन (सेवानिवृत्त) चंद्रमोहन रणधीर, फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, विश्व संवाद केंद्राचे प्रसाद बर्वे, समीर गौतम, रविंद्र बोकारे, अतुल मोघे प्रामुख्याने उपस्थित होते. 

२ लाख घरापर्यंत पोहोचणार स्वदेशी जागरण मंचतर्फे राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेची सुरुवात १२ जानेवारी रोजी करण्यात आली होती. विदर्भात ५ ते २० ऑगस्टमध्ये स्वदेशी पंधरवडा राबविण्यात येईल. यामाध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. ‘चायनिज’ वस्तूंमुळे देशासमोर निर्माण झालेले संकट, त्याचे धोके याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येईल. चीनचे वित्तीय आक्रमण परतावून लावण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यात येईल. या १५ दिवसांत नागपुरातील २ लाख घरांपर्यंत तर इतर जिल्ह्यांतील ५० हजार ते १ लाख घरांपर्यंत कार्यकर्ते प्रत्यक्ष पोहोचतील, अशी माहिती अजय पत्की यांनी दिली.