शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

पंतप्रधान मोदींनी केला आचारसंहितेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : बांगलादेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : बांगलादेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मतदानाचा दिवस असतानादेखील बांगलादेशमध्ये जाऊन मोदी पश्चिम बंगालबाबत भाषण देत असून, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असून मतांसाठी मार्केटिंग करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी लावला. खडगपूर येथे एका प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.

२०१९ साली लोकसभा निवडणुकांदरम्यान एक बांगलादेशी अभिनेते आमच्या रॅलीत सहभागी झाले होते. तेव्हा भाजपने तेथील सरकारवर दबाव आणून त्यांचा व्हिजा रद्द केला होता. आता पंतप्रधान एका समाजाची मते मिळावी यासाठी बांगलादेशला गेले आहेत. त्यांचा व्हिजादेखील रद्द झाला पाहिजे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी शनिवारी ओरकांडी येथे मतुआ समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली व मतुआ समाजाच्या प्रार्थनास्थळात जाऊन दर्शन घेतले. येवळी त्यांनी तेथील लोकांना संबोधितदेखील केले. यावरच ममता यांनी आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये ५०हून अधिक जागांवर मतुआ समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे.