शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

प्राथमिक शिक्षण मातृभाषेत द्यावे

By admin | Updated: March 16, 2015 11:20 IST

देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संमत करण्यात आला.

नागपूर : देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संमत करण्यात आला. केंद्र व राज्य शासनांनी भाषेविषयक धोरणाचा आढावा घ्यावा व प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन या प्रस्तावांतर्गत करण्यात आले. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या या सभेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. देशविदेशातील विविध भाषांचे शिक्षण घ्यायलाच हवे. परंतु शैक्षणिक अभ्यासक्रमात मातृभाषेचे प्रचंड महत्त्व आहे. यामुळे संस्कृती, परंपरा व जीवनमूल्ये समजण्यास मदत होते. संयुक्त राष्ट्राने याची दखल घेत २१ जानेवारी रोजी मातृभाषा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, मदनमोहन मालवीय यांनीदेखील मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरला होता. त्यामुळे शिक्षणात याला प्राधान्य द्यायला हवे अशा आशयाचा प्रस्ताव सभेत सकाळच्या सत्रात मांडण्यात आला. या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली व एकमताने हा संमत करण्यात आला. देशातील नागरिकांनी शिक्षण तसेच व्यावहारिक व सामाजिक जीवनात संवादासाठी मातृभाषेचाच उपयोग करावा. कुटुंबातील सदस्यांनी याला प्रोत्साहन द्यावे व पालकांनी याबाबत आग्रही भूमिका घ्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. सभेच्या अखेरच्या दिवशी संघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)आधुनिक तंत्रज्ञानावर भरआजच्या तारखेत संघ विस्तार योग्य दिशेने सुरू आहे. युवा पिढीला जोडण्यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून महिन्याला तीन हजारांहून अधिक जण जोडले जात आहेत. बुद्धिजीवी वर्गाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकदेखील संघशाखांकडे वळत असल्याची माहिती सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिली.तीन वर्षांसाठी संघाची प्रमुख उद्दिष्टे> साडेसहा लाख गावांत संघशाखांचा विस्तार करणे> ग्रामविकासाच्या अधिक उपक्रम राबविणे> आदिवासी व वंचितांसाठी अधिकाधिक सेवाकार्याचे नियोजन> समाजातून भेदभाव नष्ट करणे