शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

किंमत तीच, मालाचे वजन कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

नागपूर : महागाईत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून, गरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ...

नागपूर : महागाईत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून, गरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे फिनिश मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यातच स्पर्धेच्या युगात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॅकिंगची किंमत तीच ठेवून मालाचे वजन कमी करून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यात कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत. या स्पर्धेत ग्राहकांचा मात्र तोटा होत आहे.

स्पर्धेच्या युगात कंपन्यांना मालाची किंमत वाढविणे परवडणारे नाही. त्यातून अनोखा मार्ग काढत ५, १० रुपयांच्या पॅकेटचा आकार छोटा केला आहे. याची पुसटशी कल्पना ग्राहकांना नाही. मात्र मालाची विक्री धडाक्यात होत आहे. बिस्किट, चिप्स, कुरकुरे, नमकीन, मॅगी, नुडल्स, मिक्सर, नट, गूळ, काजू, बदाम आणि अन्य खाद्यपदार्थांचे पॅकेट छोटे करून बाजारात विक्री करण्यात येत आहेत. अर्थात १०० ग्रॅमचे पॅकेट ८० ग्रॅम आणि ७५ ग्रॅमचे पॅकेट ६० ग्रॅमवर आले आहे. खरेदी करताना याची कल्पना लोकांना आलीच नाही.

ग्राहकांनी सजग राहावे

नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, एफएमसीजी कंपन्या उत्पादनाचा खर्च वाढल्याच्या नावाखाली पॅकिंग वस्तूंचे वजन कमी करीत आहे. वर्षभरात खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाले आहेत. अन्य कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. ५ आणि १० रुपयांत मिळणारे चिप्स आणि कुरकुऱ्यांच्या वजनात घट झाली आहे. पारले, ब्रिटानिया, बिक्स फार्म कंपन्यांनी ५, १०, २०, ३० रुपयांच्या बिस्किट पॅकिंगचे वजन कमी केले आहे, तर काहींनी नमकीनचे वजन पूर्वीचेच ठेवून भाव वाढविले आहेत. टूथपेस्टचेही वजन कमी झाले आहे. काही सजग ग्राहक याबाबत विचारणा करतात; पण आम्ही काहीही करू शकत नाही. ब्रॅण्डेड मालाची विक्री जास्त होत असल्यामुळे माल विक्रीसाठी ठेवावा लागतो. काय खरेदी करावे, हे ग्राहकांवर अवलंबून आहे.

कणीक, तांदूळ, बेसन, रवा, मैदा, खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ग्राहक दूर जाण्याच्या भीतीने कंपन्या जास्त किमतीत विकण्यास तयार नाहीत. त्यामुळे मालाची किंमत तशीच ठेवून वजन कमी करून विकण्यात कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत. एकीकडे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, तर दुसरीकडे कोरोनामुळे बाजारात मंदी आहे. त्यामुळेच वजन कमी करून नफा त्याच प्रमाणात ठेवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.

छोट्या पॅकेटची बाजारपेठ मोठी

गेल्या काही वर्षांपासून घरोघरी मुलांसाठी ५ आणि १० रुपयांचे चिप्स व नमकीनचे पॅकेट खरेदीचे प्रमाण वाढले आहे. छोट्या पॅकेटची बाजारपेठ वाढली आहे. ग्राहक दूर जाऊ नये म्हणून कंपन्या मालाचे वजन कमी करून नेहमीच विक्री करतात. भाव वाढविण्याची जोखीम कोणतीही कंपनी घेत नाही. मात्रा कमी करून त्याच किमतीत विकून कंपन्या नफा कमवित आहेत. कंपन्यांचे अधिकारी म्हणाले, कमी किमतीच्या श्रेणीतील उत्पादनाचे पॅकिंग आणि जाहिरातींवर जास्त खर्च येतो. शिवाय स्वस्त वस्तूंचे लोकांमध्ये आकर्षण आहे. त्यामुळेच कंपन्या जोखीम घेत नाहीत.

कंपन्या भाव न वाढविता वजन करतात कमी

पॅकबंद मालाची किंमत पूर्वीसारखीच ठेवून कंपन्या मालाचे वजन कमी करतात. याची कल्पना ग्राहकांना येत नाही. साबण असो वा खाद्यपदार्थ पॅकिंगच्या वस्तूंचे वजन अशाच प्रकारे कमी-कमी होत आहे. कंपन्यांचा नफा ठरला आहे. त्यामुळेच भाव न वाढविता कंपन्या वजन कमी करतात. ग्राहकांनीही जागरूक राहावे.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघ