शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या मिरचीचे भाव काेसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : यावर्षी तालुक्यातील कपाशी गुलाबी बाेंडअळी तर धानाचे पीक तुडतुडे व खाेडअळीने फस्त केले. त्यामुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : यावर्षी तालुक्यातील कपाशी गुलाबी बाेंडअळी तर धानाचे पीक तुडतुडे व खाेडअळीने फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त मिरचीच्या पिकावर हाेती. दिवाळीनंतर आठवडाभर तेजीत असलेल्या हिरव्या मिरचीचे दर नंतर काेसळले. यात हाेणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात कपाशी, साेयाबीन, धान व मिरची ही पिके माेठ्या प्रमाणात घेतली जातात. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे साेयाबीनवर येल्लाे माेझॅक आणि धानावर तुडतुडे व खाेडअळीसह अन्य किडी व बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर कापसाची बाेंडं गुलाबी बाेंडअळींनी फस्त करणे सुरू केले. त्यामुळे साेयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले. किडींपासून पिकांना वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या फवारणीमुळे या तिन्ही पिकांच्या उत्पादनखर्चात वाढ झाली.

परिणामी, शेतकऱ्यांनी त्यांचे लक्ष्य मिरचीवर केंद्रित केले. तालुक्यातील मांढळ, पचखेडी, वेलतूर, राजाेला, साळवा या भागात मिरचीचे माेठे उत्पादन घेतले जाते. पूर्वी हिरवी मिरची विकण्याची तालुक्यात साेय नसल्याने तालुक्यातील शेतकरी माैदा बाजारपेठेत हिरवी मिरची विकायला न्यायचे. ही साेय तालुक्यात झाल्याने शेतकऱ्यांनी ती कुही व मांढळ बाजारपेठेत विकायला सुरुवात केली. दिवाळीनंतर आठवडाभर मिरचीच्या दरात तेजी हाेती. त्यानंतर भाव काेसळताच शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या भावातून मिरची तोडण्याची मजुरी भरून निघत नाही, अशी माहिती प्रदीप कुलरकर, माेहन बांते, सतीश गाेंदेवार, शंकर देशमुख, रामदास लुटे, धनपाल लाेहारे, महेश घुगुसकर, प्रवीण लांडगे, भगवान वाघमारे, भगवान नागलवाडे, अनिल बावणे, खुशाल ठवकर, उद्धव वाघमारे, संजय मेश्राम, नीलेश कुर्जेकार, शालिक शेबे, बंडू तितरमारे, सुरेश वाघमारे, नत्थू फाेपसे या शेतकऱ्यांनी दिली.

---

शेतकरी आंदाेलनाचा फटका

पूर्वी हिरव्या मिरचीचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलाे हाेते. ते आता १० ते १२ रुपये प्रति किलाेवर आले आहेत. मिरची ताेडण्यासाठी प्रति मजूर २०० रुपये प्रति दिवस मजुरी द्यावी लागते. या भागातील हिरवी मिरची दिल्ली व उत्तर प्रदेशात पाठविली जाते. दिल्ली येथे शेतकरी आंदाेलन सुरू असल्याने त्या भागात मिरची पाठविणे बंद झाल्याने दर काेसळले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.