शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हिरव्या मिरचीचे भाव काेसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : यावर्षी तालुक्यातील कपाशी गुलाबी बाेंडअळी तर धानाचे पीक तुडतुडे व खाेडअळीने फस्त केले. त्यामुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : यावर्षी तालुक्यातील कपाशी गुलाबी बाेंडअळी तर धानाचे पीक तुडतुडे व खाेडअळीने फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त मिरचीच्या पिकावर हाेती. दिवाळीनंतर आठवडाभर तेजीत असलेल्या हिरव्या मिरचीचे दर नंतर काेसळले. यात हाेणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात कपाशी, साेयाबीन, धान व मिरची ही पिके माेठ्या प्रमाणात घेतली जातात. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे साेयाबीनवर येल्लाे माेझॅक आणि धानावर तुडतुडे व खाेडअळीसह अन्य किडी व बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर कापसाची बाेंडं गुलाबी बाेंडअळींनी फस्त करणे सुरू केले. त्यामुळे साेयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले. किडींपासून पिकांना वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या फवारणीमुळे या तिन्ही पिकांच्या उत्पादनखर्चात वाढ झाली.

परिणामी, शेतकऱ्यांनी त्यांचे लक्ष्य मिरचीवर केंद्रित केले. तालुक्यातील मांढळ, पचखेडी, वेलतूर, राजाेला, साळवा या भागात मिरचीचे माेठे उत्पादन घेतले जाते. पूर्वी हिरवी मिरची विकण्याची तालुक्यात साेय नसल्याने तालुक्यातील शेतकरी माैदा बाजारपेठेत हिरवी मिरची विकायला न्यायचे. ही साेय तालुक्यात झाल्याने शेतकऱ्यांनी ती कुही व मांढळ बाजारपेठेत विकायला सुरुवात केली. दिवाळीनंतर आठवडाभर मिरचीच्या दरात तेजी हाेती. त्यानंतर भाव काेसळताच शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या भावातून मिरची तोडण्याची मजुरी भरून निघत नाही, अशी माहिती प्रदीप कुलरकर, माेहन बांते, सतीश गाेंदेवार, शंकर देशमुख, रामदास लुटे, धनपाल लाेहारे, महेश घुगुसकर, प्रवीण लांडगे, भगवान वाघमारे, भगवान नागलवाडे, अनिल बावणे, खुशाल ठवकर, उद्धव वाघमारे, संजय मेश्राम, नीलेश कुर्जेकार, शालिक शेबे, बंडू तितरमारे, सुरेश वाघमारे, नत्थू फाेपसे या शेतकऱ्यांनी दिली.

---

शेतकरी आंदाेलनाचा फटका

पूर्वी हिरव्या मिरचीचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलाे हाेते. ते आता १० ते १२ रुपये प्रति किलाेवर आले आहेत. मिरची ताेडण्यासाठी प्रति मजूर २०० रुपये प्रति दिवस मजुरी द्यावी लागते. या भागातील हिरवी मिरची दिल्ली व उत्तर प्रदेशात पाठविली जाते. दिल्ली येथे शेतकरी आंदाेलन सुरू असल्याने त्या भागात मिरची पाठविणे बंद झाल्याने दर काेसळले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.