शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१३ क्विंटलला सहा हजाराचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नवीन साेयाबीनला उत्तम भाव मिळत असल्याचे संदेश साेशल मीडियावर व्हायरल हाेत असतानाच उमरेड कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : नवीन साेयाबीनला उत्तम भाव मिळत असल्याचे संदेश साेशल मीडियावर व्हायरल हाेत असतानाच उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ एका शेतकऱ्याकडील १३ क्विंटल २० किलाे साेयाबीन प्रति क्विंटल ६,००१ रुपये दराने खरेदी करण्यात आले. उर्वरित ८७ क्विंटल साेयाबीनची खरेदी मात्र प्रति क्विंटल ३,४०० ते ४,५०० रुपये दराने खरेदी करण्यात आले. अति पाऊस व प्रतिकूल वातावरणामुळे साेयाबीनचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे काळवंडलेले साेयाबीनदेखील शेतकऱ्यांनी बाजारात विकायला आणले हाेते.

ओलावा अधिक, काळवंडलेला, कांड्यायुक्त आणि तेलही काढले जाऊ शकत नाही, अशा अत्यंत दयनीय अवस्थेमधील सोयाबीन गुरुवारी (दि. २३) उमरेडच्या पहिल्याच बाजारात दाखल झाले. अति पावसामुळे सोयाबीनचे कसे हाल झालेत, याचे चित्र प्रत्यक्षात बघावयास मिळाले. ओलावा, काळवंडलेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल ३,४०० ते ४,५०० रुपये दर मिळाले. चेतन रमेश नैनवाणी, रा. बेला, ता. उमरेड या एकमेव शेतकऱ्याकडील १३ क्विंटल २० किलाे साेयाबीनला प्रति क्विंटल ६,००१ रुपये दर मिळाला. ही साेयाबीन अडते मंगेश डहाके यांनी खरेदी केली. उमरेड बाजार समितीच्या आवारात पहिल्या दिवशी (गुरुवार, दि. २३) ९९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

मागील काही दिवसांपासून विविध बाजार समित्यांचे दाखले देत सोयाबीनला किती चांगले भाव मिळत आहेत, हे दाखविण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात होते. वास्तविक काही बाजार समित्यांमध्ये केवळ शुभारंभ म्हणून १-२ क्विंटलला हा भाव दिल्या गेला आणि बातम्या पसरविल्या गेल्या. दरम्यान, साेयाबीन खरेदीच्या शुभारंभप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपाध्यक्ष ॲड. विजय खवास, संचालक विकास देशमुख, शिवदास कुकडकर, हिरामण नागपुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

.....

साेशल मीडियावरील ‘बाता’

कुठे ११,१११ तर कुठे १०,५०० रुपये प्रति क्विंटल दराने साेयाबीनची खरेदी सुरू असल्याचे मॅसेज साेशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. वास्तवात, या दराने केवळ ५६ ते ६७ किलाे साेयाबीन खरेदी करण्यात आली, याकडे कुणीही बारकाईने लक्ष दिले नाही. जेव्हा या मॅसेजवर विश्वास ठेवणारे शेतकरी उमरेड बाजार समितीत साेयाबीन विकायला गेले तेव्हा त्यांना ३,४०० ते ४,५०० रुपये दर अनुभवायला मिळाला.

...

आधी मदतीचे बोला

अति पावसामुळे ओलावा अधिक आणि काळवंडलेल्या अवस्थेतील सोयाबीन प्रत्येक शेतकऱ्यांकडे बघावयास मिळणार आहे. उत्पादनात प्रचंड घट आणि निकृष्ट दर्जाचे सोयाबीन या संकटामुळे अनेकांना कापणी आणि काढणी परवडणारी नाही. शिवाय उमरेड विभागात संततधार सुरूच आहे. यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतामधून बाजारात पोहोचेल की नाही, याची शाश्वतीच उरली नाही. यामुळे आता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. केवळ पोकळ आश्वासने नको, आधी मदतीचे बोला, असाही संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत.