शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विदेशात जाण्यापासून रोखणे हे मूलभूत अधिकाराचे हननच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 08:45 IST

Nagpur News नागरिकांना विदेशात जाण्यापासून रोखणे मूलभूत अधिकाराचे हननच होय, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.

ठळक मुद्देवैयक्तिक स्वातंत्र्याचा व्यापक विचार केला

राकेश घानोडे

नागपूर : भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयात वैयक्तिक स्वातंत्र्याचा व्यापक दृष्टिकोणातून विचार करण्यात आला व नागरिकांना विदेशात जाण्यापासून रोखणे मूलभूत अधिकाराचे हननच होय, असे स्पष्ट करण्यात आले.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. कोणत्याही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अडथळ्याशिवाय विदेशात जाणे आणि देशात परत येणे, भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक भाग आहे. हे स्वातंत्र केवळ अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण देण्यापुरते मर्यादित ठेवले जाऊ शकत नाही. वैयक्तिक स्वातंत्र्याचा अर्थ व्यापक आहे. त्यात विदेशात प्रवास करण्याच्या अधिकाराचाही समावेश होतो. आर्टिकल २१ अनुसार कायदेशीर तरतूद नसेल तर, कोणत्याही नागरिकाला या अधिकारापासून वंचित केले जाऊ शकत नाही. असे करणे मूलभूत अधिकाराची पायमल्ली ठरते, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

नागपूर येथील ऋण वसुली न्यायाधिकरणने गुप्ता एनर्जी कंपनीचे अनुराग पद्मेश गुप्ता यांना विदेशात जाण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्या याचिकेवर हा निर्णय दिला,तसेच ऋण वसुली न्यायाधिकरण विदेशात जाण्याची परवानगी नाकारू शकत नाही,ऋण वसुली कायद्याने न्यायाधिकरणला असा आदेश जारी करण्याचा अधिकार दिलेला नाही, याकडे लक्ष वेधले.

असे आहे प्रकरण

१ - स्टेट बँक ऑफ इंडियाने गुप्ता व इतर संचालकांकडून ११० कोटी १५ लाख रुपयाचे कर्ज वसूल करण्याकरिता ऋण वसुली न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला आहे. गुप्ता या कर्जाचे वैयक्तिक हमीदार आहेत.

२ - बँकेने गुप्ता यांना विदेशात जाण्यास मनाई करावी व त्यांचा पासपोर्ट जप्त करावा,अशी विनंती न्यायाधिकरणला केली होती. त्यामुळे न्यायाधिकरणने १८ जानेवारी २०१८ रोजी अंतरिम आदेश जारी करून गुप्ता यांना विदेशात जाण्यास मनाई केली होती.

३ - गुप्ता यांना नात्यातील लग्नाकरिता ९ ते १७ जूनपर्यंत टर्की येथे जायचे आहे. त्यामुळे त्यांनी विदेशात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज २३ मे २०२२ रोजी खारीज करण्यात आला होता.

४ - उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेश रद्द केला. गुप्ता यांची मालमत्ता व ६७ कोटीची मुदत ठेव बँकेकडे गहाण आहे. त्यांनी १७ जूनला भारतात परत येण्याची व प्राधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याची ग्वाही दिली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय