शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राष्ट्रवादीने जिल्ह्यातही नेमले कार्याध्यक्ष

By admin | Updated: October 3, 2015 03:26 IST

राष्ट्रवादीने नागपूर शहरात कार्याध्यक्ष नेमताच आता जिल्हा ग्रामीण मध्येही कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत.

राजाभाऊ टांकसाळे यांची नियुक्ती : बंग यांनाही समान न्याय नागपूर : राष्ट्रवादीने नागपूर शहरात कार्याध्यक्ष नेमताच आता जिल्हा ग्रामीण मध्येही कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजाभाऊ टांकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शहर व जिल्ह्यात माजी मंत्री अध्यक्ष तर त्यांचे विश्वासू कार्याध्यक्ष असे चित्र निर्माण झाले आहे. टांकसाळे हे बंग यांचे निष्ठावान मानले जातात. पक्ष संघटनेत कामाचा दांडगा अनुभव आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार व व्यसनमुक्ती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहर व जिल्ह्यात गटबाजी वाढली होती. यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रामबाण उपाय शोधून काढत माजी मंत्री अनिल देशमुख यांची शहर अध्यक्षपदी तर माजी मंत्री रमेश बंग यांची जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मंत्री राहिलेल्या नेत्यांना शहर व जिल्ह्याची जबाबदारी सोपविल्यामुळे हे एकप्रकारे डिमोशनच आहे, अशी चर्चा पक्षात रंगली होती. आपल्याकडील अध्यक्षपदाचा कार्यभार काढावा, अशी विनंती देशमुख यांनी पक्षाकडे केली होती. बंग शांत होते. देशमुखांना जो न्याय मिळेल तो आपल्याही मिळेल, हे त्यांना ठाऊक होते. नुकतेच झालेल्या राष्ट्रवादीच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात खा. प्रफुल पटेल यांनी दोन्ही अध्यक्षांना चिमटे काढत काही वेळ यांना काम करू द्या, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे करून देशमुख व बंग यांची घुसमट वाढविली होती. मात्र, पवार यांनी त्याच कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांचा आवाका मोठा असल्यामुळे त्यांना शहर व जिल्ह्यात गुंतवून ठेवता येणार नाही, लवकरच मोठी जबाबदारीही पार पाडावी लागेल, असे सांगत दिलासाही दिला होता. मेळाव्यानंतर दोनच दिवसांनी अनिल देशमुख यांनी नागपूर शहरासाठी प्रवीण कुंटे पाटील यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली व त्यांच्याकडे कार्यालयीन कामकाजही सोपविले. त्या वेळी ग्रामीणमध्ये बंग कार्याध्यक्ष नेमतील का, अशी चर्चा सुरू झाली होती. आता टांकसाळे यांच्या नियुक्तीमुळे बंग यांनाही पक्षाने समान न्याय दिला आहे. (प्रतिनिधी)पक्षाने संघर्षाच्या काळात महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. येत्या जिल्हाध्यक्षांनी पक्षवाढीसाठी दिलेले कार्यक्रम जोमाने राबविले जातील. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची मान उंचावली जाईल, असे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल.- राजाभाऊ टांकसाळेकार्याध्यक्ष, जिल्हा ग्रामीण