शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

अस्सल मराठी गीतांचे सादरीकरण

By admin | Updated: January 23, 2015 02:48 IST

आशा भोसले यांनी दीदींचे ज्ञानेश्वरीचे गीत ‘अवचिता परिमळु...’ आणि यशवंत देव यांचे ‘विसरशील खास मला..’ सुरेश भटांचे ‘मलमली तारुण्य माझे...’ सादर केले.

नागपूर : आशा भोसले यांनी दीदींचे ज्ञानेश्वरीचे गीत ‘अवचिता परिमळु...’ आणि यशवंत देव यांचे ‘विसरशील खास मला..’ सुरेश भटांचे ‘मलमली तारुण्य माझे...’ सादर केले. त्यानंतर त्यांनी ठसक्यात लावणीला प्रारंभ केला. ‘येता जाता धक्का का हो मारता...रेशमाच्या रेघांनी.., हाय बुगडी माझी सांडली ग...’ सादर करून रसिकांची दाद घेतली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘गोमु संगतीने माझ्या तू येशील का...’ हे गीत त्यांच्या नातवासह चिंटू भोसलेसह सादर केले. निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या आग्रहाखातर त्यांनी हे गीत वेगवेगळे गायक कसे सादर करतील. याची नक्कल करुन दाखविली. यात त्यांनी नुरजहाँ, गुलाम अली, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ आणि दीदींच्या शैलीत गीत सादर केले. त्यांना हिंदी गीत सादर करण्याची विनंती करण्यात आली पण मी अस्सल मराठी असल्याचे सांगून हिंदी गीत सादर करणे टाळले.खा. विजय दर्डा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन आशा भोसले यांच्या कार्यक्रमापूर्वी नागपूर महोत्सवाचे उद्घाटन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आ. जोगेन्द्र कवाडे, आ. सुधाकर देशमुख, आ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, मनपा स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नागपूर महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, संयोजक संदीप जोशी,विभागीय आयुक्त अनुपकुमार, नासुप्र सभापती श्याम वर्धने, मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर, मनपा शिक्षण समिती सभापती चेतना टांक, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, सभापती रमेश सिंगारे, बसपा नेता किशोर गजभिये, मुन्ना यादव, अविनाश ठाकरे, बंडू राऊत, रश्मी तिवारी, प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकसे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन खा. विजय दर्डा यांनी केले. याप्रसंगी खा. विजय दर्डा यांनी महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली. हे वर्ष विदर्भासाठी महोत्सवाचेच वर्ष आहे. नागपूरचे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री झालेत आणि येथीलच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. त्या आनंदाचे सेलिब्रेशनच या महोत्सवाच्या माध्यमातून आपण करीत आहोत. पक्षीय मतभेद बाजूला सारून नितीनजी आणि फडणवीस हे राज्याचा आणि विदर्भाचा विकास करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे संचालन शुभांगी रायलु यांनी तर प्रास्ताविक सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी यांनी केले. आभार महापौर प्रवीण दटके यांनी मानले. पत्रकारांची गैरसोय यंदा पत्रकारांसाठी विशेष जागा राखून ठेवण्यात आली पण ती जागा वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी अयोग्य होती. मुख्य रंगमंचाच्या फार दूर मीडिया कक्ष ठेवण्यात आला. त्यामुळे रंगमंचावरचे अतिथी आणि गायक कलावंत यांचे चेहरे पत्रकारांना स्पष्ट दिसत नव्हते. याशिवाय स्टेजपासून पत्रकारांना दूर अंतरावर बसविण्यात आल्याने कार्यक्रमाचे वार्तांकन करताना अडचणी येत होत्या. कारण रंगमंचावरील प्रकाश पत्रकारांपर्यंत पोहोचत नसल्याने नोंदी लिहिणे कठीण झाले. हा महोत्सव लाखो लोकांपर्यंत माध्यमांच्या स्वरूपात पोहोचविणाऱ्या पत्रकारांची किमान सोय करायला हवी होती, असा सूर यावेळी होता. (प्रतिनिधी)सुरेश भटांना ‘मिस’ करते : आशा भोसले सुरेश भट म्हणजे श्रेष्ठ कवी होते. त्यांची कविता नेहमीच माझ्यासमोर उभी राहते. ते विलक्षण ताकदीचे कवी होते. त्यांनी लिहिलेली गीते आजही काळजात घर करून आहेत. अनेकदा विदेशात असताना डोंगर, वनराई पाहिली सुरेश भटांच्या कवितेनेच निसर्गाचे रूप घेतल्याचा भास होतो. त्यांच्या आठवणींनी मी नेहमीच व्याकुळ होते. नागपुरात येऊन त्यांच्याशी भेट झाली नाही, असे कधीच झाले नाही. त्यामुळेच त्यांनी मी खूप मिस करते, असे आशा भोसले म्हणाल्या. आशातार्इंचा शतायुषी सत्कार येथेच करणार : गडकरी याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, खा. विजय दर्डा, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आशातार्इंचा सत्कार नागपूरकरांच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, आशातार्इंच्या वयाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचा नागपुरात पुन्हा सत्कार करू. याप्रसंगी आशातार्इंनीही खा. दर्डा आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रतिसाद देत दाद दिली. नागपूरकर कलावंतांना संधी आशातार्इंनी गायनाला प्रारंभ करण्यापूर्वी आशातार्इंच्या विनंतीवरून दोन नागपूरकर कलावंतांना संधी देण्यात आली. यात शहरातील गायिका भाग्यश्री बारस्कर यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला...’ आणि सारंग जोशी यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे...’ हे गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. प्रारंभी काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य, बँडपथकाचे वादन आणि जिम्नॅॅस्टीकचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.