शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत सुरक्षा यंत्रणा सज्ज

By admin | Updated: September 23, 2015 06:19 IST

याकूब मेमनच्या फाशीनंतर मिळालेल्या धमक्यांच्या अनुषंगाने सणासुदीच्या दिवसात उपराजधानीत घातपात किंवा जातीय

नरेश डोंगरे ल्ल नागपूरयाकूब मेमनच्या फाशीनंतर मिळालेल्या धमक्यांच्या अनुषंगाने सणासुदीच्या दिवसात उपराजधानीत घातपात किंवा जातीय दंगलीसारखा प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलाकडून खास खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीनकुमार बिहारी येथे आले असून पुढचे आठ दिवस ते नागपुरातच तळ ठोकून राहणार आहे. या कालावधीत आत्मघाती हल्ला किंवा जातीय दंगलीसारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना करायच्या त्यासाठी सुरक्षा यंत्रणा कामी लागली आहे.मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला नागपुरात फाशी देण्यात आल्यामुळे टायगर मेमनने थेट पाकिस्तानातूनच ‘अंजाम भुगतने को तय्यार रहो‘ अशी धमकी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानातून भारतात पाठविण्यात आलेल्या नावेदसह अनेक दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतरही अनेक दहशतवादी भारतात शिरल्याचा अंदाज आहे. दहशतवादी संघटनांचे स्लीपर आधीपासूनच देशातील विविध प्रांतात आणि मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरात कार्यरत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून घातपात घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी यापूर्वी अनेकदा वर्तविली आहे. सणोत्सवात जागोजागी गर्दी असते. अशा वेळी दहशतवाद्यांना त्यांचे इप्सित साध्य करणे शक्य होते. नागपूर अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर अव्वलस्थानी आहे. येथे याकूबला फाशी देण्यात आल्यापासून घातपाताचा धोका अधिकच वाढला आहे. गणेशोत्सवामुळे ठिकठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेता उपराजधानीत घातपात घडवून आणण्याची तयारी दहशतवादी संघटनांनी चालविल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याची चर्चा आहे. गणेशोत्सवादरम्यानच ईद आल्यामुळे घातपात किंवा जातीय दंगलीचा धोका अधिक तीव्र असल्याचे बोलले जाते. त्याचमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर, एडीजी (अतिरिक्त पोलीस महासंचालक) स्पेशल आॅपरेशन, बिपीनकुमार बिहारी सोमवारी नागपुरात पोहचले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बैठका, चर्चा करून त्यांना आवश्यक ते निर्देश दिले. बुधवारी पुन्हा ते निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. दरम्यान, दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक कार्यालयातही मंगळवारी धावपळ होती. या संबंधाने प्रस्तुत प्रतिनिधीने एडीजी बिहारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘असे काहीही नाही‘ म्हटले. गर्दी अन् धोकासूत्रांच्या माहितीनुसार, २५, २६, २७ आणि २८ हे चार दिवस धोक्याचे आहेत. २५ ला ईद असून, २७ ला अनंत चतुर्दशी आहे. २७ आणि २८ ला विसर्जनाची धूम असते. या दोन दिवसांत मिरवणुका निघतात. विसर्जनाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. त्याचा गैरफायदा उचलून दहशतवादी आपल्या कलुषित मनसुब्यांना पूर्ण करण्याचे प्रयत्न करू शकतात. दयाल यांची दक्षताराज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राज्यात कोणती घातपाताची घटना घडली तर त्यांच्या कारकिर्दीवर ठपका लागेल. ते टाळण्यासाठी दयाल सर्वच प्रकारची दक्षता घेत आहेत. येथील पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी एडीजी बिहारी यांना पाठविल्याचेही वरिष्ठ अधिकारी सांगतात.