शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विदर्भातील वाघ सह्याद्रीला हलविण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST

राज्यात सध्याच्या घडीला ३१२ वाघ आहेत. त्यातील ३०० च्या जवळपास वाघ केवळ विदर्भात आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात ६५ तर ...

राज्यात सध्याच्या घडीला ३१२ वाघ आहेत. त्यातील ३०० च्या जवळपास वाघ केवळ विदर्भात आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात ६५ तर चंद्रपूरच्या ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात १८० च्यावर वाघ आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची जैवविविधता आणि जंगल वाघांच्या अधिवासासाठी चांगले ठरले असून या भागात वाघांची संख्याही वाढली आहे. मात्र, संख्या वाढल्याने टेरिटरीसाठी त्यांचा आपसातील संघर्षही हाेत असून अर्धे अधिक वाघ जंगलाबाहेर येत आहेत. जंगलाबाहेर येणारे वाघ मानवी वस्त्यांमध्ये शिरले असून यामुळे माणसांशी संघर्ष वाढला आहे. दरवर्षी माणसे व पाळीव प्राणी त्यांचे बळी ठरले आहेत. हा संघर्ष टाळण्यासाठी विदर्भातल वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व इतर भागात स्थलांतरित करण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. माहितीनुसार तज्ज्ञ अभ्यासक व भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली हाेती. राज्य शासनाने वन्यजीव व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या १० वर्षांच्या कृती आराखड्यातही ही याेजना आखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात विदर्भातील वाघ सह्याद्री जंगलातही दिसतील, ही शक्यता आहे.

वनभवनात जागतिक व्याघ्र दिन साजरा

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून गुरुवारी वनभवन, नागपूर येथे राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामावर आधारित वेबिनारचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विकासकामे करताना वने व वन्यजीवांना बाधा हाेणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. राज्याचे पर्यावरण, वातावरण बदल व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित हाेते. या वेबिनारदरम्यान ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक डाॅ. ज्याेती बॅनर्जी, सह्याद्री प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये हाेणाऱ्या विविध कामांची, उपक्रमांची माहिती दिली. डब्लूआरटीसी, गाेरेवाडाचे संचालक डाॅ. शिरीष उपाध्याय यांनी केंद्राची माहिती दिली. प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी आभार मानले. संचालन स्नेहल पाटील यांनी केले.