शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

विदर्भातील वाघ सह्याद्रीला हलविण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST

राज्यात सध्याच्या घडीला ३१२ वाघ आहेत. त्यातील ३०० च्या जवळपास वाघ केवळ विदर्भात आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात ६५ तर ...

राज्यात सध्याच्या घडीला ३१२ वाघ आहेत. त्यातील ३०० च्या जवळपास वाघ केवळ विदर्भात आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात ६५ तर चंद्रपूरच्या ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात १८० च्यावर वाघ आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची जैवविविधता आणि जंगल वाघांच्या अधिवासासाठी चांगले ठरले असून या भागात वाघांची संख्याही वाढली आहे. मात्र, संख्या वाढल्याने टेरिटरीसाठी त्यांचा आपसातील संघर्षही हाेत असून अर्धे अधिक वाघ जंगलाबाहेर येत आहेत. जंगलाबाहेर येणारे वाघ मानवी वस्त्यांमध्ये शिरले असून यामुळे माणसांशी संघर्ष वाढला आहे. दरवर्षी माणसे व पाळीव प्राणी त्यांचे बळी ठरले आहेत. हा संघर्ष टाळण्यासाठी विदर्भातल वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व इतर भागात स्थलांतरित करण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. माहितीनुसार तज्ज्ञ अभ्यासक व भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली हाेती. राज्य शासनाने वन्यजीव व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या १० वर्षांच्या कृती आराखड्यातही ही याेजना आखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात विदर्भातील वाघ सह्याद्री जंगलातही दिसतील, ही शक्यता आहे.

वनभवनात जागतिक व्याघ्र दिन साजरा

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून गुरुवारी वनभवन, नागपूर येथे राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामावर आधारित वेबिनारचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विकासकामे करताना वने व वन्यजीवांना बाधा हाेणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. राज्याचे पर्यावरण, वातावरण बदल व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित हाेते. या वेबिनारदरम्यान ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक डाॅ. ज्याेती बॅनर्जी, सह्याद्री प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये हाेणाऱ्या विविध कामांची, उपक्रमांची माहिती दिली. डब्लूआरटीसी, गाेरेवाडाचे संचालक डाॅ. शिरीष उपाध्याय यांनी केंद्राची माहिती दिली. प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी आभार मानले. संचालन स्नेहल पाटील यांनी केले.