शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

हैवानी याकूबच्या मनाची फाशीसाठी तयारी

By admin | Updated: July 23, 2015 02:53 IST

२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता.

मौत कब आएगी? : पश्चात्ताप नाही, अस्वस्थता मात्र कायम लोकमत विशेषयोगेश पांडे नागपूर२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. ‘मौत कब आएगी और कितनी दर्दनाक होगी?’ हा प्रश्न तो सातत्याने विचारत होता. नंतर मात्र आपल्या दुष्कृत्याचे समर्थन करणारी मानसिकता तो बनवत गेला. सध्याच्या घडीला याकूब शांत असून फाशीवर चढायला काही दिवस शिल्लक राहिले असतानादेखील त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही.२२ वर्षांअगोदर झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी करण्यात आलेल्या ‘ब्रेनवॉशिंग’चे परिणाम अद्यापही कायम असून त्याला पश्चाताप झाला ही बाब कपोलकल्पित आहे. याकूबने हे हैवानी कृत्य रागाच्या भरात किंवा विकृत मानसिकतेतून केले नव्हते. होणाऱ्या परिणामांची त्याला जाणीव होती असे त्याच्यावर अनेक वर्षे मानसिक उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले आहे.२००७ साली नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. परंतु मुंबईच्या ‘आॅर्थर रोड’ तुरुंगात असतानापासूनच त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यानंतर त्याच्यावर जे.जे.इस्पितळात उपचारदेखील झाले होते. नागपुरात आल्यानंतर त्याला मानसिक आजाराचा फारसा त्रास झाला नाही. परंतु तुरुंगातील मानसोपचार तज्ज्ञ नियमितपणे त्याची भेट घ्यायचे. तुरुंगात एरवी शांत व फारसा कोणाशी न बोलणारा याकूब मानसोपचार तज्ज्ञांजवळ आपले मन मोकळे करायचा. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर तो संतापला होता. माझे मरण नेमके कधी येईल व शिक्षा कुठे होईल याबाबतीत विचारणा करायचा. परंतु नंतर तो स्वत:च मरणाची काय भीती बाळगायची, ‘जो किया वह सोच कर ही किया’ असे म्हणायला लागला.आतादेखील याकूबला मोठा मानसिक आजार नाही. एक काळ होता की त्याच्याकडे इतर सहकाऱ्यांना भाषा शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता तो अंडा सेलमध्ये असून त्याला इतर कैद्यांशी भेटू दिले जात नाही. ‘आॅर्थर रोड’ जेलमधील सुरुवातीच्या दिवसांमध्येदेखील अशीच स्थिती होती. त्यामुळे त्याला एकटेपणामुळे मानसिक नैराश्य आले आहे. परंतु त्याला केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही. मरणाला तो तयार आहे असे संबंधित मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.रात्री झोप येण्यासाठी गोळ््यायाकूब मेमनला मुंबईपासूनच रात्री झोप न येण्याचा त्रास आहे. एकटेपणातून आलेल्या मानसिक नैराश्यामुळे त्याला रात्री झोप लागायची नाही. अनेकदा तर झोपेच्या गोळ््या घेणे भाग पडले. आजही या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. पश्चाताप नव्हे, दिसतो तो संतापगुन्हेगाराला फाशीवर नेत असताना त्याला पश्चाताप होतो व तो विनवण्या करतो असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केला असता यात फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. अनेकदा फाशीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनुसार, फाशीच्या वेळी संबंधित गुन्हेगाराच्या मनात पश्चाताप नव्हे तर भीती असते. या भीतीमधून निघणारा संताप व्यवस्थेवर व उपस्थित व्यक्तींवर निघतो. आकांडतांडव करणे, पाय झाडणे, शिव्या देणे असे प्रकार त्यांच्याकडून करण्यात येतात. वरून शांत वाटणारे गुन्हेगारदेखील अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देतात असे मत गुन्हेगारी मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ.विजय शिंगणापुरे यांनी दिले.