शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

हैवानी याकूबच्या मनाची फाशीसाठी तयारी

By admin | Updated: July 23, 2015 02:53 IST

२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता.

मौत कब आएगी? : पश्चात्ताप नाही, अस्वस्थता मात्र कायम लोकमत विशेषयोगेश पांडे नागपूर२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. ‘मौत कब आएगी और कितनी दर्दनाक होगी?’ हा प्रश्न तो सातत्याने विचारत होता. नंतर मात्र आपल्या दुष्कृत्याचे समर्थन करणारी मानसिकता तो बनवत गेला. सध्याच्या घडीला याकूब शांत असून फाशीवर चढायला काही दिवस शिल्लक राहिले असतानादेखील त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही.२२ वर्षांअगोदर झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी करण्यात आलेल्या ‘ब्रेनवॉशिंग’चे परिणाम अद्यापही कायम असून त्याला पश्चाताप झाला ही बाब कपोलकल्पित आहे. याकूबने हे हैवानी कृत्य रागाच्या भरात किंवा विकृत मानसिकतेतून केले नव्हते. होणाऱ्या परिणामांची त्याला जाणीव होती असे त्याच्यावर अनेक वर्षे मानसिक उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले आहे.२००७ साली नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. परंतु मुंबईच्या ‘आॅर्थर रोड’ तुरुंगात असतानापासूनच त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यानंतर त्याच्यावर जे.जे.इस्पितळात उपचारदेखील झाले होते. नागपुरात आल्यानंतर त्याला मानसिक आजाराचा फारसा त्रास झाला नाही. परंतु तुरुंगातील मानसोपचार तज्ज्ञ नियमितपणे त्याची भेट घ्यायचे. तुरुंगात एरवी शांत व फारसा कोणाशी न बोलणारा याकूब मानसोपचार तज्ज्ञांजवळ आपले मन मोकळे करायचा. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर तो संतापला होता. माझे मरण नेमके कधी येईल व शिक्षा कुठे होईल याबाबतीत विचारणा करायचा. परंतु नंतर तो स्वत:च मरणाची काय भीती बाळगायची, ‘जो किया वह सोच कर ही किया’ असे म्हणायला लागला.आतादेखील याकूबला मोठा मानसिक आजार नाही. एक काळ होता की त्याच्याकडे इतर सहकाऱ्यांना भाषा शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता तो अंडा सेलमध्ये असून त्याला इतर कैद्यांशी भेटू दिले जात नाही. ‘आॅर्थर रोड’ जेलमधील सुरुवातीच्या दिवसांमध्येदेखील अशीच स्थिती होती. त्यामुळे त्याला एकटेपणामुळे मानसिक नैराश्य आले आहे. परंतु त्याला केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही. मरणाला तो तयार आहे असे संबंधित मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.रात्री झोप येण्यासाठी गोळ््यायाकूब मेमनला मुंबईपासूनच रात्री झोप न येण्याचा त्रास आहे. एकटेपणातून आलेल्या मानसिक नैराश्यामुळे त्याला रात्री झोप लागायची नाही. अनेकदा तर झोपेच्या गोळ््या घेणे भाग पडले. आजही या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. पश्चाताप नव्हे, दिसतो तो संतापगुन्हेगाराला फाशीवर नेत असताना त्याला पश्चाताप होतो व तो विनवण्या करतो असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केला असता यात फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. अनेकदा फाशीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनुसार, फाशीच्या वेळी संबंधित गुन्हेगाराच्या मनात पश्चाताप नव्हे तर भीती असते. या भीतीमधून निघणारा संताप व्यवस्थेवर व उपस्थित व्यक्तींवर निघतो. आकांडतांडव करणे, पाय झाडणे, शिव्या देणे असे प्रकार त्यांच्याकडून करण्यात येतात. वरून शांत वाटणारे गुन्हेगारदेखील अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देतात असे मत गुन्हेगारी मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ.विजय शिंगणापुरे यांनी दिले.