शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उमरेड तालुक्यात उन्हाळी सोयाबीनला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:07 IST

उमरेड : आधी किडींचा हल्लाबोल. येलो मोझॅकने वाढविलेली डोकेदुखी आणि परतीच्या पावसाचा दणका यामुळे सरत्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची ...

उमरेड : आधी किडींचा हल्लाबोल. येलो मोझॅकने वाढविलेली डोकेदुखी आणि परतीच्या पावसाचा दणका यामुळे सरत्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची दाणादाण झाली. उत्पादनात कमालीची घट, दाणा बारीक आणि बहुतांश खराब उत्पादनामुळे शेतकरी बेचैन झालेत.

आधीच उत्पादन कमी झाल्याने २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकणार आहे. सोयाबीन बियाणांची पंचाईत येणार असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे सुविधा आहेत त्यांनी उन्हाळी सोयाबीनसाठी पाऊल उचलावे, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.

उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल याकडे दिसून येत असून, आतापावेतो ४०० एकर क्षेत्रात उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे उत्पादन नगण्य झाले. या कारणामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी ज्यांच्या शेतात कपाशी आहे, शिवाय ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन केले जात आहे. रबी हंगामाच्या शेवटी अथवा उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनासाठी पेरणी करता येणे शक्य आहे. डिसेंबर शेवटचा आठवडा ते जानेवारीचा पहिला पंधरवडा यादरम्यान ही पेरणी करता येऊ शकेल. ९० दिवसांचे सोयाबीन पीक असून, गावाची गरज गावातच भागवावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्याजवळील बियाणे राखून ठेवण्याचेही आवाहन केले जात आहे.

---

शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नसेल तर खरीप हंगामातील उत्पादनाचा वापर यासाठी करता येईल. त्याच्या उगवण शक्तीची तपासणी करून बीजोत्पादनासाठी वापर करावा. उत्पादन नेहमीच्या उत्पादनापेक्षा कमी होत असले तरी बीजोत्पादनासाठी उपयोगी ठरणार आहे.

संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड