शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

राष्ट्रहिताला प्राधान्य द्या

By admin | Updated: October 2, 2016 02:49 IST

राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, गरिबांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या, साधूसंतांची सेवा करा, संस्कृती आणि नैतिकतेचे संरक्षण करा,...

मुनिश्री प्रतीकसागर महाराज : दिगंबर जैन जागरण युवा संघाच्या अधिवेशनात आवाहननागपूर : राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, गरिबांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या, साधूसंतांची सेवा करा, संस्कृती आणि नैतिकतेचे संरक्षण करा, भू्रणहत्येविरुद्ध जनजागृती, गोवंश रक्षा, अशा धार्मिक-सामाजिक कार्यात कधीही खंड पडू देऊ नका, असे आवाहन मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांनी केले. अखिल भारतीय दिगंबर जैन जागरण युवा संघाचे चौथे अधिवेशन शनिवारी रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात मुनीश्री बोलत होेते. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांनी पदाची शपथ घेतली. या अधिवेशनात मुंबई, कोपरगाव, सोलापूर, दिल्ली, इंदूर, ग्वाल्हेर, उदयपूर, फलटण, अकलूज अशा देशातील विविध शहरांमधून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशन सुरू होण्याआधी सकाळी खंडेलवाल भवन, भाजीमंडी इतवारी येथून निघालेली शोभायात्रा नंतर कार्यक्रमस्थळी पोहोचली. सुनील पेंढारी व नीता पेंढारी यांच्या हस्ते मंचचे उद्घाटन झाले. यावेळी बालिकांनी मंगलाचरण नृत्य सादर केले.जैन युवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील गंगवाल यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, दिगंबर जैन महासभेचे विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष सुरेश आग्रेकर, महासमितीच्या महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. रिचा जैन, सुरेश जैन, कन्हैयालाल ढालावत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा, वर्धमान अर्बन को-आॅप. बँकेचे संचालक अतुल कोटेचा उपस्थित होते. यावेळी अभयकुमार पनवेलकर, सुमत लल्ला, संजय टक्कामोरे, अरविंद जैन, त्रिलोकचंद जैन, हीराचंद मिश्रिकोटकर उपस्थित होते. कार्र्यक्रमाचे संचालन महेश तिवारी तर आभार नागपूर शाखेचे अध्यक्ष मनोज जैन यांनी मानले. केवळ नावाने नव्हे, कर्माने जैन बनासकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मला जैन समाजाच्या एकतेवर विश्वास आहे. एक काळ असा होता जेव्हा देशाच्या संसदेत जैन धर्माच्या खासदारांची संख्या ५५ होती. आता मोजकेच खासदार उरले आहेत. मी याआधी चार वेळा जैन संतांच्या चातुर्मासाचे संयोजन केले आहे. १९९४ साली प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या चातुर्मासात सर्व धर्माचे संत एका मंचावर आले होते. आज आमची स्थिती मोकळ्या मुठीसारखी आहे. परिणामी आमचा आवाज बुलंद होत नाही. हे चित्र बदलायचे असेल दिगंबर-श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी असा भेद सोडून एकत्र यावे लागेल. तेव्हाच आम्ही समाजासमोर आमचे विचार सशक्तपणे मांडू शकू. पण, यासाठी आधी आम्हाला खऱ्या अर्थाने जैन बनावे लागेल, आपल्या धर्माप्रति जागरुक व्हावे लागेल. केवळ नावाने जैन होऊन उपयोग नाही आम्हाला कर्मानेही जैन व्हावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)