शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

राष्ट्रहिताला प्राधान्य द्या

By admin | Updated: October 2, 2016 02:49 IST

राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, गरिबांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या, साधूसंतांची सेवा करा, संस्कृती आणि नैतिकतेचे संरक्षण करा,...

मुनिश्री प्रतीकसागर महाराज : दिगंबर जैन जागरण युवा संघाच्या अधिवेशनात आवाहननागपूर : राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, गरिबांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या, साधूसंतांची सेवा करा, संस्कृती आणि नैतिकतेचे संरक्षण करा, भू्रणहत्येविरुद्ध जनजागृती, गोवंश रक्षा, अशा धार्मिक-सामाजिक कार्यात कधीही खंड पडू देऊ नका, असे आवाहन मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांनी केले. अखिल भारतीय दिगंबर जैन जागरण युवा संघाचे चौथे अधिवेशन शनिवारी रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात मुनीश्री बोलत होेते. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांनी पदाची शपथ घेतली. या अधिवेशनात मुंबई, कोपरगाव, सोलापूर, दिल्ली, इंदूर, ग्वाल्हेर, उदयपूर, फलटण, अकलूज अशा देशातील विविध शहरांमधून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशन सुरू होण्याआधी सकाळी खंडेलवाल भवन, भाजीमंडी इतवारी येथून निघालेली शोभायात्रा नंतर कार्यक्रमस्थळी पोहोचली. सुनील पेंढारी व नीता पेंढारी यांच्या हस्ते मंचचे उद्घाटन झाले. यावेळी बालिकांनी मंगलाचरण नृत्य सादर केले.जैन युवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील गंगवाल यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, दिगंबर जैन महासभेचे विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष सुरेश आग्रेकर, महासमितीच्या महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. रिचा जैन, सुरेश जैन, कन्हैयालाल ढालावत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा, वर्धमान अर्बन को-आॅप. बँकेचे संचालक अतुल कोटेचा उपस्थित होते. यावेळी अभयकुमार पनवेलकर, सुमत लल्ला, संजय टक्कामोरे, अरविंद जैन, त्रिलोकचंद जैन, हीराचंद मिश्रिकोटकर उपस्थित होते. कार्र्यक्रमाचे संचालन महेश तिवारी तर आभार नागपूर शाखेचे अध्यक्ष मनोज जैन यांनी मानले. केवळ नावाने नव्हे, कर्माने जैन बनासकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मला जैन समाजाच्या एकतेवर विश्वास आहे. एक काळ असा होता जेव्हा देशाच्या संसदेत जैन धर्माच्या खासदारांची संख्या ५५ होती. आता मोजकेच खासदार उरले आहेत. मी याआधी चार वेळा जैन संतांच्या चातुर्मासाचे संयोजन केले आहे. १९९४ साली प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या चातुर्मासात सर्व धर्माचे संत एका मंचावर आले होते. आज आमची स्थिती मोकळ्या मुठीसारखी आहे. परिणामी आमचा आवाज बुलंद होत नाही. हे चित्र बदलायचे असेल दिगंबर-श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी असा भेद सोडून एकत्र यावे लागेल. तेव्हाच आम्ही समाजासमोर आमचे विचार सशक्तपणे मांडू शकू. पण, यासाठी आधी आम्हाला खऱ्या अर्थाने जैन बनावे लागेल, आपल्या धर्माप्रति जागरुक व्हावे लागेल. केवळ नावाने जैन होऊन उपयोग नाही आम्हाला कर्मानेही जैन व्हावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)