शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

उपराजधानीत गारठा

By admin | Updated: December 25, 2015 03:37 IST

देशभरात कडाक्याच्या थंडीने कहर केला असताना आता उपराजधानीतही शीतलहरीने शिरकाव केला आहे.

नागपूर : देशभरात कडाक्याच्या थंडीने कहर केला असताना आता उपराजधानीतही शीतलहरीने शिरकाव केला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे शहरात चांगलाच गारठा निर्माण झाला होता. यामुळे गुरुवारी नागपुरातील किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. सायंकाळ होताच अचानक थंड वारे वाहू लागले. यामुळे संपूर्ण नागपूर गारठल्यासारखे दिसत होते. या शीतलहरीपासून बचावासाठी अनेकांनी गरम कपडे व शेकोटीचा आधार घेतला होता. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातसुद्धा नागपुरातील किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. परंतु काहीच दिवसांत पुन्हा तापमान चढल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. गुरुवारी उपराजधानीसोबतच विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमानात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यात अकोला येथील किमान तापमान सर्वांधिक म्हणजे, १०.९ अंशापर्यंत खाली आले आहे. हवामान तज्ज्ञ ए. व्ही. गोडे यांच्या मते, सध्या विदर्भात उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे येत आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन, थंडीचा जोर वाढला आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)