शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बल महिलांना ‘मंच’ची शक्ती!

By admin | Updated: September 23, 2015 06:44 IST

दिवसेंदिवस समाजात महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. महिलेला या समाजाने नेहमीच दुर्बल

नागपूर : दिवसेंदिवस समाजात महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. महिलेला या समाजाने नेहमीच दुर्बल समजले आहे. मात्र महिला ही कधीच दुर्बल राहिलेली नाही. केवळ तिला लढण्यासाठी भक्कम पाठबळाची गरज लागली आहे. शिवाय स्वत:च्या पायावर उभे होण्यासाठी आर्थिक मदतीचा हात हवा आहे. समाजातील अशा गरजू व गरीब महिलांसाठीच ‘आई तुळजा भवानी महिला मंच’ तयार झाला आहे. दुर्बल महिलांना ‘मंच’ शक्ती देण्याचे काम करीत असल्याचा विश्वास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’ च्या मंचावर व्यक्त केला. मागील आठ वर्षांपूर्वी भिसीच्या माध्यमातून केवळ १५ महिलांनी एकत्रित येऊन हा मंच तयार केला. परंतु आज या मंचातील सभासद संख्या ९०० वर पोहोचली आहे. या मंचमध्ये गृहिणींसह डॉक्टर व शिक्षिका अशा वेगवेगळ््या क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठ वर्षांत या महिला मंचचा वटवृक्ष तयार झाला आहे. या मंचच्या माध्यमातून गरजू व गरीब महिलांना आर्थिक मदत करता यावी, या हेतूने ‘आई तुळजा भवानी महिला नागरी सहकारी पतसंस्था’ स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून मागेल त्या गरजू व गरीब महिलांना ५० हजार रुपयांपर्यंत अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करू न दिले जात असल्याचे यावेळी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या या संस्थेचे १६ ते १७ लाख रुपये भागभांडवल असून त्यांच्याकडे ३० लाखांच्या ठेवी आहेत. यातून यंदा सुमारे २६ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. याचा गरीब महिलांना फार मोठा फायदा होत असून, आतापर्यंत ५० ते ६० गरीब महिलांनी संस्थेच्या कर्जावर ब्युटीपार्लर, गृह उद्योग, बुटीक सारखे स्वयंरोजगार सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, अनेक मोलकरीण महिलांना या संस्थेत सभासद करू न त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत केली जात आहे. या चर्चेत डॉ. सुनेत्रा येवले, सोनम लाखे, माधुरी मुलनकर, सुनीता राऊत, लिना भोंडे, ज्योती तपाडकर, अर्चना लांडे, अर्चना बरडे व सुनीता कोट्टेवार यांनी भाग घेतला होता.(प्रतिनिधी)शेतकऱ्यांना मदत आज विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून अनेकजण आत्महत्या करीत आहे. महिला मंचने अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मंचतील प्रत्येक सभासद वर्गणी करू न एक मोठा निधी गोळा करणार असल्याचा मानस यावेळी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना विशेष आर्थिक मदत दिली जाईल. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या मदतकार्यापासून महिला मंचने प्रेरणा घेऊन हा निर्णय घेतला असल्याचेही मंचतील महिलांनी स्पष्ट केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आई तुळजा भवानी महिला मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबविले जातात. यात दरवर्षी गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केल्या जातो. तसेच स्वयंरोजगार सुरू करू न स्वत:च्या पायावर उभे होणाऱ्या महिलांचा गौरव करू न त्यांना प्रोत्साहित केल्या जाते. पतसंस्थेच्या माध्यमातून नफा मिळविणे हा मुळीच हेतू नसून केवळ गरजू व गरीब महिलांना आर्थिक मदत करणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनेत्रा येवले यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रम या मंचच्यावतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. याशिवाय रक्तदान शिबिर, दसरा, दिवाळी व कोजागिरीसारख्या उत्सवानिमित्त हळदीकुंकवाचे कार्यक्रम साजरे केले जातात. याशिवाय सर्व सभासदांची सामूहिक सहलसुद्धा आयोजित केल्या जाते. यातून सभासदांमध्ये एक सलोखा निर्माण करणे, हा मुख्य उद्देश असल्याचे मंचच्या अध्यक्षा येवले म्हणाल्या. महिला मंचच्या माध्यमातून महिलांची एक पतसंस्था उभी करण्यात एक मार्गदर्शक म्हणून गंगाधर बोबडे यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. असा आहे, महिला मंच अध्यक्षा : डॉ. सुनेत्रा येवले, कार्याध्यक्षा : माधुरी मुलनकर, उपाध्यक्षा : सोनम लाखे, सचिव अर्चना लांडे, सहसचिव : दीपा टाकळकर, कोषाध्यक्षा : रत्ना गुलधे, सभासद : वृंदा काटकर, कविता नितनवरे, सुनीता राऊत, लिना भोंडे, पद्मजा गोडे, संगीता येवले, स्मिता बोबडे व संध्या धाकतोड यांचा समावेश आहे.