शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:11 IST

आशिष गाेडबाेले लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाकबंगला) : निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव व ...

आशिष गाेडबाेले

लाेकमत न्यूज नेटवर्क

पिपळा (डाकबंगला) : निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव व शेतमालाला बाजारात मिळत नसलेला याेग्य भाव यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. काेराेना संक्रमणामुळे त्यांच्या संकटात आणखी भर पडली. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी थकीत बिलापाेटी त्यांच्याकडील कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या नाेटीस महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना बजावल्या आहेत. यात थकीत रकमेचा भरणा नाेटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत भरण्याची सूचनाही महावितरण कंपनीने केली आहे.

यावर्षी साेयाबीनचे पीक किडींमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, किडींमुळे कापसाच्या उत्पादनातही माेठी घट आली आहे. भाजीपाल्याच्या पिकांना समाधानकारक भाव मिळत नसून, तुरीचा पेराही कमी हाेता. त्यातच शेतकऱ्यांची गहू व हरभऱ्याच्या पिकावर भिस्त हाेती. अशा विपरीत परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीच्या खापरखेडा (ता. सावनेर) कार्यालयाने इसापूर (ता. सावनेर) येथील ३५० शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत बिलाचा १५ दिवसांत भरणा करण्याच्या नाेटीस बजावल्या आहेत. या रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्याकडील कृषिपंपांचा वीजपुुरवठा खंडित करण्याची सूचनाही या नाेटीसद्वारे दिली आहे.

दिवसेंदिवस पिकांचा उत्पादन खर्च वाढत चालला असून, उत्पादनात घट येत आहे. त्यातच बाजारात शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. त्यातच काेराेनाच्या संकटाची भर पडली. पिकांचे नुकसान व उत्पादनात घट आल्याने इसापूर व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्याकडील पीककर्ज व सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा भरणा करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे त्यांनीही कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. सध्या जीवन जगणे अवघड झाल्याने बिलाचा भरणा करण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

रीडिंग न घेता बिले

कृषिपंपाच्या विजेची बिले ही रीडिंग न घेता पाठविली जाते. हा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळी सरासरी बिले दिली जात असून, न वापरलेल्या विजेच्या बिलाचाही भरणा करावा लागताे. शासनाने कृषिपंपाच्या विजेचे दर वाढविले असून, बहुतांश बिले सदाेष असतात. ही बाब महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींच्या निदर्शनास अनेकदा आणून दिली; परंतु यावर कुणीही ताेडगा काढला नाही. ही सरसकट व सरासरी रकमेची बिले अन्यायकारक लूटमार करणारी असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

...

चुकांची दुरुस्ती करा

इसापूर येथील बहुतांश शेतकऱ्यांना चुकीची बिले देण्यात आली आहेत. बिलाच्या एकूण रकमेतील ५० टक्के रकमेचा एकमुस्त भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले हाेते. या ५० टक्के रकमेचा भरणा करूनही उर्वरित रक्कम दुसऱ्या बिलात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या चुकांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यात आधी दुरुस्ती करावी, अशी मागणीही इसापूर येथील सम्राट गजभिये, कैलास गोडबोले, बंडू मेश्राम, नरेंद्र ढेपे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.