शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:11 IST

आशिष गाेडबाेले लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाकबंगला) : निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव व ...

आशिष गाेडबाेले

लाेकमत न्यूज नेटवर्क

पिपळा (डाकबंगला) : निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव व शेतमालाला बाजारात मिळत नसलेला याेग्य भाव यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. काेराेना संक्रमणामुळे त्यांच्या संकटात आणखी भर पडली. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी थकीत बिलापाेटी त्यांच्याकडील कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या नाेटीस महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना बजावल्या आहेत. यात थकीत रकमेचा भरणा नाेटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत भरण्याची सूचनाही महावितरण कंपनीने केली आहे.

यावर्षी साेयाबीनचे पीक किडींमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, किडींमुळे कापसाच्या उत्पादनातही माेठी घट आली आहे. भाजीपाल्याच्या पिकांना समाधानकारक भाव मिळत नसून, तुरीचा पेराही कमी हाेता. त्यातच शेतकऱ्यांची गहू व हरभऱ्याच्या पिकावर भिस्त हाेती. अशा विपरीत परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीच्या खापरखेडा (ता. सावनेर) कार्यालयाने इसापूर (ता. सावनेर) येथील ३५० शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत बिलाचा १५ दिवसांत भरणा करण्याच्या नाेटीस बजावल्या आहेत. या रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्याकडील कृषिपंपांचा वीजपुुरवठा खंडित करण्याची सूचनाही या नाेटीसद्वारे दिली आहे.

दिवसेंदिवस पिकांचा उत्पादन खर्च वाढत चालला असून, उत्पादनात घट येत आहे. त्यातच बाजारात शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. त्यातच काेराेनाच्या संकटाची भर पडली. पिकांचे नुकसान व उत्पादनात घट आल्याने इसापूर व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्याकडील पीककर्ज व सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा भरणा करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे त्यांनीही कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. सध्या जीवन जगणे अवघड झाल्याने बिलाचा भरणा करण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

रीडिंग न घेता बिले

कृषिपंपाच्या विजेची बिले ही रीडिंग न घेता पाठविली जाते. हा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळी सरासरी बिले दिली जात असून, न वापरलेल्या विजेच्या बिलाचाही भरणा करावा लागताे. शासनाने कृषिपंपाच्या विजेचे दर वाढविले असून, बहुतांश बिले सदाेष असतात. ही बाब महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींच्या निदर्शनास अनेकदा आणून दिली; परंतु यावर कुणीही ताेडगा काढला नाही. ही सरसकट व सरासरी रकमेची बिले अन्यायकारक लूटमार करणारी असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

...

चुकांची दुरुस्ती करा

इसापूर येथील बहुतांश शेतकऱ्यांना चुकीची बिले देण्यात आली आहेत. बिलाच्या एकूण रकमेतील ५० टक्के रकमेचा एकमुस्त भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले हाेते. या ५० टक्के रकमेचा भरणा करूनही उर्वरित रक्कम दुसऱ्या बिलात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या चुकांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यात आधी दुरुस्ती करावी, अशी मागणीही इसापूर येथील सम्राट गजभिये, कैलास गोडबोले, बंडू मेश्राम, नरेंद्र ढेपे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.