शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

उघड्यावर पडले आहे विजेचे तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:08 IST

कमल शर्मा नागपूर : शहरातील व्यापारी परिसर असलेल्या केळीबाग रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु ...

कमल शर्मा

नागपूर : शहरातील व्यापारी परिसर असलेल्या केळीबाग रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु या बांधकामाच्या प्रक्रियेत जीवघेणे दुर्लक्ष विभागाकडून होत आहे. विजेच्या भूमिगत केबलला काढून न टाकता बांधकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे तार उघड्यावर पडले आहे. हे विद्युत केबल ११ केव्ही (११ हजार वॅट) क्षमतेचे आहे. या दुर्लक्षामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

शहीद चौक ते सी.पी.अ‍ॅण्ड बेरार कॉलेज चौक दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. यात काही ठिकाणी भूमिगत असलेले विजेचे केबल बाहेर आले आहे; परंतु याकडे महावितरण अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नाही. या मुख्य लाइनशी जोडलेल्या एल.टी. लाइनचीसुद्धा अशीच अवस्था आहे.

महावितरणने रस्त्याचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून जीवित हानी होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. महावितरणचे म्हणणे आहे की, विजेच्या केबलला स्थानांतरीत केल्यानंतरच रस्त्याचे खोदकाम करायला हवे होते; परंतु असे झाले नाही. त्यामुळे विजेचे खांब पडले आहेत, तार तुटल्या आहेत, भूमिगत केबल तुटल्या आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामामुळे विद्युत केबल जेसीबी खाली आले आहे. अद्यापपर्यंत कुठलीही दुर्घटना झाली नसली तरी, परिसरातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे.

निष्काळजी इतकी की, विजेचे केबल न काढता त्याच्यावर रस्ता बनविण्यात आला आहे. त्यामुळे विजेचे केबल रस्त्याच्या खाली आले आहे. भविष्यात काही बिघाड झाल्यास रस्त्याचे खोदकाम करावे लागणार आहे. नियमानुसार भूमिगत वीज, पाणी, टेलिफोन लाइनसाठी रस्त्याच्या किनाऱ्यावर नियोजन करावे लागते.

- समस्या गंभीर, लवकरच सोडवू : पीडब्ल्यूडी

सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) चे अभियंता अतुल गोटे यांनी मान्य केले की, समस्या गंभीर आहे. ते म्हणाले की, समस्या तत्काळ सोडविण्यात येईल. उघड्यावर पडलेल्या केबलला झाकण्यात येईल. विभाग रस्त्याच्या बांधकामासंदर्भात सर्व खबरदारी पाळेल.

- विद्युत केबल काढण्याचे इस्टीमेट दिले : महावितरण

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रसन्ना श्रीवास्तव म्हणाले की, पीडब्ल्यूडीला बरेच पत्र पाठवून समस्येबाबत अवगत केले आहे. बडकस चौक ते सी.पी. अ‍ॅण्ड बेरार कॉलेजपर्यंत टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल लाइनला स्थानांतरीत करण्यासाठी २४८५७५ रुपयांचे इस्टीमेट तयार करून दिले आहे. बरेच पत्र दिले असतानाही कारवाई झाली नाही.