शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सकाळ-सायंकाळ ५ ते ८ यावेळेत वीज संकट; वीज कपातीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 20:10 IST

Nagpur News सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे.

ठळक मुद्दे परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा महावितरणचा दावा कृषिपंपांना आठ तास वीज

नागपूर : भार व्यवस्थापनाच्या माध्यमातून भारनियमन (लोडशेडिंग) नियंत्रणात ठेवणे व परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा महावितरणने केला असला, तरी सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात नियंत्रण करणे कठीण होत आहे. परिणामी बहुतांश लोडशेडिंग याच काळात होत आहे. त्यामुळे भविष्यातही याच वेळेत वीज कपात होण्याची शक्यता दिसून येते.

कंपनीतील सूत्रांचे म्हणणे आहे की, सकाळी व सायंकाळी ५ ते ८ यावेळेत वीज संकट वाढण्याची परिस्थिती आहे. सौरऊर्जेद्वारा कंपनीला दिवसा जवळपास २ हजार मेगावॅट वीज मिळत आहे. परंतु, सकाळी व सायंकाळी याचे उत्पादन २०० ते ३०० मेगावॅटपर्यंतच होत आहे. दुसरीकडे सायंकाळनंतर विजेची मागणीसुद्धा प्रचंड वाढते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जी-१ व जी-२ श्रेणीमध्ये एक-एक तास आणि जी-३ श्रेणीमध्ये सव्वा तास वीज कपात झाली. दुसरीकडे कंपनीचा असा दावा आहे की, तापमान व विजेची मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे निर्माण झालेले वीज संकट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यानंतर कुठेही लोडशेडिंग झाले नाही. मागील दोन दिवसात कृषिपंपांना ८ तास वीज दिली जात आहे.

लोडशेडिंग नियंत्रणात आणण्यासाठी झालेले प्रयत्न

- पॉवर एक्सचेंजकड़ून २००० मेगावॅट वीज खरेदी केली

- केंद्र सरकारकडून कोळसा व गॅस पुरवठा वाढविण्याची मागणी

- महावितरणने केली महाजेनकोला अधिकाधिक वीज उत्पादन करण्याची विनंती

- राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये वॉर रूम

- लोडशेडिंग तात्पुरते असल्याचे म्हटले आहे

एनटीपीसीचे सोलापूर युनिट सुरू झाल्याने दिलासा, महाजेनकोकडून निराशा

एनटीपीसीच्या सोलापूर वीज केंद्रातील ५०० मेगावॅट युनिटचे उत्पादन शनिवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे वीज संकटाशी सामना करत असलेल्या राज्याला थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु, महाजेनकोच्या वीज केंद्रांकडून मात्र निराशा होत आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज केंद्रांचे क्षमतेप्रमाणे उत्पादन होत नाही. महाजेनकोकडून मिळत असलेल्या विजेच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याचे महावितरणचे अधिकारीही स्पष्टपणे सांगत आहेत.

टॅग्स :electricityवीज