शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सकाळ-सायंकाळ ५ ते ८ यावेळेत वीज संकट; वीज कपातीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 20:10 IST

Nagpur News सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे.

ठळक मुद्दे परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा महावितरणचा दावा कृषिपंपांना आठ तास वीज

नागपूर : भार व्यवस्थापनाच्या माध्यमातून भारनियमन (लोडशेडिंग) नियंत्रणात ठेवणे व परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा महावितरणने केला असला, तरी सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात नियंत्रण करणे कठीण होत आहे. परिणामी बहुतांश लोडशेडिंग याच काळात होत आहे. त्यामुळे भविष्यातही याच वेळेत वीज कपात होण्याची शक्यता दिसून येते.

कंपनीतील सूत्रांचे म्हणणे आहे की, सकाळी व सायंकाळी ५ ते ८ यावेळेत वीज संकट वाढण्याची परिस्थिती आहे. सौरऊर्जेद्वारा कंपनीला दिवसा जवळपास २ हजार मेगावॅट वीज मिळत आहे. परंतु, सकाळी व सायंकाळी याचे उत्पादन २०० ते ३०० मेगावॅटपर्यंतच होत आहे. दुसरीकडे सायंकाळनंतर विजेची मागणीसुद्धा प्रचंड वाढते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जी-१ व जी-२ श्रेणीमध्ये एक-एक तास आणि जी-३ श्रेणीमध्ये सव्वा तास वीज कपात झाली. दुसरीकडे कंपनीचा असा दावा आहे की, तापमान व विजेची मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे निर्माण झालेले वीज संकट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यानंतर कुठेही लोडशेडिंग झाले नाही. मागील दोन दिवसात कृषिपंपांना ८ तास वीज दिली जात आहे.

लोडशेडिंग नियंत्रणात आणण्यासाठी झालेले प्रयत्न

- पॉवर एक्सचेंजकड़ून २००० मेगावॅट वीज खरेदी केली

- केंद्र सरकारकडून कोळसा व गॅस पुरवठा वाढविण्याची मागणी

- महावितरणने केली महाजेनकोला अधिकाधिक वीज उत्पादन करण्याची विनंती

- राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये वॉर रूम

- लोडशेडिंग तात्पुरते असल्याचे म्हटले आहे

एनटीपीसीचे सोलापूर युनिट सुरू झाल्याने दिलासा, महाजेनकोकडून निराशा

एनटीपीसीच्या सोलापूर वीज केंद्रातील ५०० मेगावॅट युनिटचे उत्पादन शनिवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे वीज संकटाशी सामना करत असलेल्या राज्याला थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु, महाजेनकोच्या वीज केंद्रांकडून मात्र निराशा होत आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज केंद्रांचे क्षमतेप्रमाणे उत्पादन होत नाही. महाजेनकोकडून मिळत असलेल्या विजेच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याचे महावितरणचे अधिकारीही स्पष्टपणे सांगत आहेत.

टॅग्स :electricityवीज