शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळ-सायंकाळ ५ ते ८ यावेळेत वीज संकट; वीज कपातीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 20:10 IST

Nagpur News सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे.

ठळक मुद्दे परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा महावितरणचा दावा कृषिपंपांना आठ तास वीज

नागपूर : भार व्यवस्थापनाच्या माध्यमातून भारनियमन (लोडशेडिंग) नियंत्रणात ठेवणे व परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा महावितरणने केला असला, तरी सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात नियंत्रण करणे कठीण होत आहे. परिणामी बहुतांश लोडशेडिंग याच काळात होत आहे. त्यामुळे भविष्यातही याच वेळेत वीज कपात होण्याची शक्यता दिसून येते.

कंपनीतील सूत्रांचे म्हणणे आहे की, सकाळी व सायंकाळी ५ ते ८ यावेळेत वीज संकट वाढण्याची परिस्थिती आहे. सौरऊर्जेद्वारा कंपनीला दिवसा जवळपास २ हजार मेगावॅट वीज मिळत आहे. परंतु, सकाळी व सायंकाळी याचे उत्पादन २०० ते ३०० मेगावॅटपर्यंतच होत आहे. दुसरीकडे सायंकाळनंतर विजेची मागणीसुद्धा प्रचंड वाढते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जी-१ व जी-२ श्रेणीमध्ये एक-एक तास आणि जी-३ श्रेणीमध्ये सव्वा तास वीज कपात झाली. दुसरीकडे कंपनीचा असा दावा आहे की, तापमान व विजेची मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे निर्माण झालेले वीज संकट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यानंतर कुठेही लोडशेडिंग झाले नाही. मागील दोन दिवसात कृषिपंपांना ८ तास वीज दिली जात आहे.

लोडशेडिंग नियंत्रणात आणण्यासाठी झालेले प्रयत्न

- पॉवर एक्सचेंजकड़ून २००० मेगावॅट वीज खरेदी केली

- केंद्र सरकारकडून कोळसा व गॅस पुरवठा वाढविण्याची मागणी

- महावितरणने केली महाजेनकोला अधिकाधिक वीज उत्पादन करण्याची विनंती

- राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये वॉर रूम

- लोडशेडिंग तात्पुरते असल्याचे म्हटले आहे

एनटीपीसीचे सोलापूर युनिट सुरू झाल्याने दिलासा, महाजेनकोकडून निराशा

एनटीपीसीच्या सोलापूर वीज केंद्रातील ५०० मेगावॅट युनिटचे उत्पादन शनिवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे वीज संकटाशी सामना करत असलेल्या राज्याला थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु, महाजेनकोच्या वीज केंद्रांकडून मात्र निराशा होत आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज केंद्रांचे क्षमतेप्रमाणे उत्पादन होत नाही. महाजेनकोकडून मिळत असलेल्या विजेच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याचे महावितरणचे अधिकारीही स्पष्टपणे सांगत आहेत.

टॅग्स :electricityवीज