शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

रॉकेलचे पिंप ओतून तीन पोलिसांसह ठाणेच दिले पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 11:45 IST

१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला.

- गोपालकृष्ण मांडवकर 

नागपूर : १६ ऑगस्ट १९४२ रोजी सत्याग्रह करायला आष्टीच्या पोलीस ठाण्यावर गेलेल्या क्रांतिकारकांच्या छातीवर इंग्रज पोलिसांनी गोळ्या झाडल्या. रक्तबंबाळ होऊन ते पडले होते. जमाव पोहोचला. म्हणाला, गेट उघडा, आम्हाला आत येऊन जखमी सोबत्यांना पाणी पाजायचे आहे. ठाणेदार मस्तावलेला होता. म्हणाला, ‘हम कुत्ते का मूत पिलायेंगे, वो शहीद नही, कुत्ते है..!’ क्रांतिकारी भडकले. ठाण्यात घुसले. पोलिसांना पळता भुई थोडी केली. तिघे जण तर ठाण्यात खाटेखाली लपून बसले. त्यांना हुडकून खाटेवर रॉकेलचे पिंप ओतले अन् त्या तिघांसह पोलीस ठाण्यालाच आग लावून दिली... ठाणेदाराचाही चेंदामेंदा केला !

काय झाले १६ ऑगस्टला? 

१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. किव्हाया, अंतोरा, खंबीत, वडाळा आदी परिसरातील गावागावांत जाऊन या क्रांतिवीरांनी दप्तरे जाळली. १६ ऑगस्टला वडाळ्याचे १५० सत्याग्रही लेंडी नदीजवळ पोहचले. आष्टीचे तरुण त्यांना भेटले. ११ वाजता २०० वर सत्याग्रही आष्टीच्या गांधी चौकात गोळा झाले. झेंडा फडकवित ४०० जण पोलीस ठाण्यावर गेले. इन्स्पेक्टर मिश्रा याला फाटक उघडण्यास सांगितले. त्याने ४-५ जणांनाच येण्यास फर्मावले. मात्र एकापाठोपाठ सर्वच जण आत शिरले. 

....आणि ठिणगी पडली

मिश्राने गोळीबारासाठी खुणावले. रामभाऊ लोहे छाती काढून गरजले, ‘त्यांना कशाला मारता, अरे मला मारा’, पोलिसांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. ते घायाळ होऊन पडले. वडळा येथील पंछीगोंडला, उदेभान कुबळे, केशवराव ढोंगे, रशिदखॉ नबाब हे क्रांतिवीर सरसावले, त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या. ते धाराशाही झाले. खडकीचा १८ वर्षांचा तरुण हरिलाल गोळीला बळी पडला. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन