शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

रॉकेलचे पिंप ओतून तीन पोलिसांसह ठाणेच दिले पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 11:45 IST

१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला.

- गोपालकृष्ण मांडवकर 

नागपूर : १६ ऑगस्ट १९४२ रोजी सत्याग्रह करायला आष्टीच्या पोलीस ठाण्यावर गेलेल्या क्रांतिकारकांच्या छातीवर इंग्रज पोलिसांनी गोळ्या झाडल्या. रक्तबंबाळ होऊन ते पडले होते. जमाव पोहोचला. म्हणाला, गेट उघडा, आम्हाला आत येऊन जखमी सोबत्यांना पाणी पाजायचे आहे. ठाणेदार मस्तावलेला होता. म्हणाला, ‘हम कुत्ते का मूत पिलायेंगे, वो शहीद नही, कुत्ते है..!’ क्रांतिकारी भडकले. ठाण्यात घुसले. पोलिसांना पळता भुई थोडी केली. तिघे जण तर ठाण्यात खाटेखाली लपून बसले. त्यांना हुडकून खाटेवर रॉकेलचे पिंप ओतले अन् त्या तिघांसह पोलीस ठाण्यालाच आग लावून दिली... ठाणेदाराचाही चेंदामेंदा केला !

काय झाले १६ ऑगस्टला? 

१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. किव्हाया, अंतोरा, खंबीत, वडाळा आदी परिसरातील गावागावांत जाऊन या क्रांतिवीरांनी दप्तरे जाळली. १६ ऑगस्टला वडाळ्याचे १५० सत्याग्रही लेंडी नदीजवळ पोहचले. आष्टीचे तरुण त्यांना भेटले. ११ वाजता २०० वर सत्याग्रही आष्टीच्या गांधी चौकात गोळा झाले. झेंडा फडकवित ४०० जण पोलीस ठाण्यावर गेले. इन्स्पेक्टर मिश्रा याला फाटक उघडण्यास सांगितले. त्याने ४-५ जणांनाच येण्यास फर्मावले. मात्र एकापाठोपाठ सर्वच जण आत शिरले. 

....आणि ठिणगी पडली

मिश्राने गोळीबारासाठी खुणावले. रामभाऊ लोहे छाती काढून गरजले, ‘त्यांना कशाला मारता, अरे मला मारा’, पोलिसांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. ते घायाळ होऊन पडले. वडळा येथील पंछीगोंडला, उदेभान कुबळे, केशवराव ढोंगे, रशिदखॉ नबाब हे क्रांतिवीर सरसावले, त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या. ते धाराशाही झाले. खडकीचा १८ वर्षांचा तरुण हरिलाल गोळीला बळी पडला. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन