शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

रॉकेलचे पिंप ओतून तीन पोलिसांसह ठाणेच दिले पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 11:45 IST

१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला.

- गोपालकृष्ण मांडवकर 

नागपूर : १६ ऑगस्ट १९४२ रोजी सत्याग्रह करायला आष्टीच्या पोलीस ठाण्यावर गेलेल्या क्रांतिकारकांच्या छातीवर इंग्रज पोलिसांनी गोळ्या झाडल्या. रक्तबंबाळ होऊन ते पडले होते. जमाव पोहोचला. म्हणाला, गेट उघडा, आम्हाला आत येऊन जखमी सोबत्यांना पाणी पाजायचे आहे. ठाणेदार मस्तावलेला होता. म्हणाला, ‘हम कुत्ते का मूत पिलायेंगे, वो शहीद नही, कुत्ते है..!’ क्रांतिकारी भडकले. ठाण्यात घुसले. पोलिसांना पळता भुई थोडी केली. तिघे जण तर ठाण्यात खाटेखाली लपून बसले. त्यांना हुडकून खाटेवर रॉकेलचे पिंप ओतले अन् त्या तिघांसह पोलीस ठाण्यालाच आग लावून दिली... ठाणेदाराचाही चेंदामेंदा केला !

काय झाले १६ ऑगस्टला? 

१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. किव्हाया, अंतोरा, खंबीत, वडाळा आदी परिसरातील गावागावांत जाऊन या क्रांतिवीरांनी दप्तरे जाळली. १६ ऑगस्टला वडाळ्याचे १५० सत्याग्रही लेंडी नदीजवळ पोहचले. आष्टीचे तरुण त्यांना भेटले. ११ वाजता २०० वर सत्याग्रही आष्टीच्या गांधी चौकात गोळा झाले. झेंडा फडकवित ४०० जण पोलीस ठाण्यावर गेले. इन्स्पेक्टर मिश्रा याला फाटक उघडण्यास सांगितले. त्याने ४-५ जणांनाच येण्यास फर्मावले. मात्र एकापाठोपाठ सर्वच जण आत शिरले. 

....आणि ठिणगी पडली

मिश्राने गोळीबारासाठी खुणावले. रामभाऊ लोहे छाती काढून गरजले, ‘त्यांना कशाला मारता, अरे मला मारा’, पोलिसांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. ते घायाळ होऊन पडले. वडळा येथील पंछीगोंडला, उदेभान कुबळे, केशवराव ढोंगे, रशिदखॉ नबाब हे क्रांतिवीर सरसावले, त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या. ते धाराशाही झाले. खडकीचा १८ वर्षांचा तरुण हरिलाल गोळीला बळी पडला. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन