शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जलसंपदाची पदभरती स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 03:14 IST

राज्य जलसंपदा विभागाच्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता पदभरतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

‘बीई’च्या विद्यार्थ्यांना डावलले : इच्छुक उमेदवारांची न्यायालयात धावयोगेश पांडे नागपूर राज्य जलसंपदा विभागाच्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता पदभरतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या पदांसाठी विभागाकडून केवळ अभियांत्रिकी पदविका उमेदवारांचेच अर्ज मागविण्यात आले होते. यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करीत अभियांत्रिकी पदवीप्राप्त इच्छुक उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयांमध्ये याविरोधात याचिका दाखल केल्या. संबंधित याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आला नसल्यामुळे विभागाने हा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’नेच सर्वात अगोदर हे प्रकरण उचलून धरले होते.जलसंपदा व जलसंधारण विभागातील गट ‘ब’अंतर्गत येणाऱ्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या भरतीसाठी विभागाकडून जानेवारी महिन्यात जाहिरात देण्यात आली. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समितीच्या वतीने महाआॅनलाईनच्या माध्यमातून २५ मार्च रोजी राज्यातील सहा विभागांतील जिल्हास्थानी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती.पदनिवडीसाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील तीन वर्षे कालावधीची पदविका आवश्यक असल्याची अट ठेवण्यात आली व यामुळे चार वर्षे ‘बीई’ (बॅचलर आॅफ इंजिनिअरिंग) केलेले उमेदवारांचे ‘आॅनलाईन’ अर्ज नाकारण्यात आले. ‘बीई’ही पदवी पदविकेपेक्षा जास्त दर्जाची असूनदेखील अशाप्रकारे डावलल्याविरोधात संतप्त इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातदेखील फिर्याद मांडली. यादरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानादेखील जर भरती प्रक्रिया राबविली तर अडचण निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन संबंधित प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. उमेदवारांमध्ये संभ्रमदरम्यान, ही पदभरती स्थगित झाली असल्याबाबतदेखील उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बहुतांश उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका मांडली व पदवी उमेदवारांनादेखील अर्ज भरू देण्याची परवानगी मागितली. या प्रक्रियेवर स्थगितीची कुठलीही मागणी केलेली नाही. मग कशाच्या आधारावर पदभरतीला स्थगिती देण्यात आली आहे, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)