शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

उन्हाळी परीक्षा पोस्टपोन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे २४ मे पासून उन्हाळी परीक्षांना सुरुवात होणार आहे. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे २४ मे पासून उन्हाळी परीक्षांना सुरुवात होणार आहे. परंतु सध्या महाविद्यालये कोरोना निर्बंधांमुळे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याचे मोठे आव्हान महाविद्यालयांसमोर राहणार आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षा पोस्टपोन करा असा महाविद्यालयांचा सूर आहे.

सद्यस्थितीत हिवाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या नेमक्या कधी होतील याबाबत काहीच स्पष्टता नाही. दुसरीकडे २४ मे पासून उन्हाळी परीक्षा घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. या परीक्षेकरिता १८ मेपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. मात्र, सध्या कोरोना स्थितीमुळे सगळीकडील शिक्षण संस्था पूर्णपणे बंद आहे. पोलिसांचा रस्त्यावर बंदोबस्त असून कर्मचाऱ्यांना महाविद्यालयामध्ये येता येत नाही. विद्यार्थ्यांना देखील अर्ज भरण्यात अडचणी जात आहेत. महाविद्यालयांमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण झाले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षांचे अर्ज १८ मे पर्यंत विद्याापीठाकडे जमा करणे अशक्य आहे. कर्मचारी नसताना हे अर्ज स्वीकारावयाचे कसे, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र घेण्याकरिता काॅलेजांमध्ये कसे बोलवायचे असे प्रश्न महाविद्याालयांसमोर आहेत.

प्राचार्य फोरमची देखील मागणी

दरम्यान, प्राचार्य फोरमने देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, असे प्राचार्य फोरमने म्हटले आहे. फोरमतर्फे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना पत्र देण्यात आले आहे.

अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलणार ?

विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंतच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परंतु मे च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसीच्या परीक्षांबाबत काहीच निर्णय झालेला नाही. कोरोनाची स्थिती कायम राहिली तर त्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.