शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

‘बीएड’च्या परीक्षा परत ‘पोस्टपोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे दुसऱ्यांदा परीक्षा ‘पोस्टपोन’ करावी लागली आहे. जी परीक्षा २०१९ च्या हिवाळ्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती आता कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

२०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली होती. मात्र, पहिला पेपर होताच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांची प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. त्यामुळे ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. आता नागपुरात येऊन परीक्षा कशी द्यायची व त्या कालावधीत रहायचे कुठे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला होता. कोरोनामुळे परीस्थिती नियंत्रित झाल्यावरच विद्यापीठाने परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली गेली व विद्यापीठानेदेखील परीक्षा पुढे ढकलली होती.

स्थिती सुधारत असल्याने विद्यापीठाने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुधारित वेळापत्रक जारी केले व २२ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात झाली. मात्र ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने विद्यापीठाने २४ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारे पेपर पुढील निर्देशांपर्यंत पुढे ढकलले आहेत. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी त्यासंदर्भातील अधिसूचनादेखील जारी केली आहे.

मनपाकडून विद्यापीठ प्रशासनाला फोन

बुधवारी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा ‘एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स’ हा पेपर होता. विद्यार्थी पेपरसाठी परीक्षा केंद्रांवरदेखील पोहोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयच ‘कोरोना’मुळे ‘सील’ करण्यात आल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर हलविण्यासाठी विद्यापीठाने वाहनेदेखील पाठविली. मात्र मनपा प्रशासनाकडून विद्यापीठाला फोन गेला व परीक्षा घेतल्यास ‘कोरोना’च्या नियमावलीचा भंग ठरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.