शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सेवानिवृत्तीनंतरचे जीवन ‘एनपीएस’ने सुलभ

By admin | Updated: October 11, 2015 03:04 IST

राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) माध्यमातून सरकारी, खासगी आणि व्यावसायिकांना सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात घालविता येते ...

‘एनएसडीएल’तर्फे आयोजन : जनजागृती कार्यक्रमनागपूर : राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) माध्यमातून सरकारी, खासगी आणि व्यावसायिकांना सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात घालविता येते आणि आर्थिक गरजासुद्धा पूर्ण करता येतात. ही योजना आर्थिक फायद्याचा सर्वोत्तम पर्याय असून त्याचा फायदा लोकांनी युवावस्थेपासूनच घ्यावा, असे आवाहन ‘एनएसडीएल’चे सहायक व्यवस्थापक भवानी सिंग यांनी येथे केले.एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने ‘एनपीएस’ची माहिती देण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सदर येथील एका हॉटेलमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. यावेळी ‘एनएसडीएल’चे सहायक उपाध्यक्ष मंदार कार्लेकर प्रामुख्याने उपस्थित होते. भवानी सिंग म्हणाले, टिअर-१ आणि टिअर-२ योजनेशी जुळता येईल. ६० वर्षांनंतर पेन्शन मिळेल. एन्यूटीच्या स्वरुपात ४० टक्के आणि एकमुश्त ६० टक्के रक्कम मिळणार आहे. आज देशात १ कोटी एनपीएस खाताधारक आहेत. त्यांची एक लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम योजनेत जमा आहे. योजनेवर पेन्शन फंड नियंत्रण विकास प्राधिकरणाची नजर असते. एकत्रित फंडाची गुंतवणूक एनपीएस ट्रस्टच्या माध्यमातून होते. गुंतवणूकदारांना तक्रार आणि निवारणाची व्यवस्था आहे. ‘एनपीएस’शी जुळल्याने विशेष लाभ आणि जास्तीत जास्त परतावा मिळतो. यासह शुल्कही कमी लागते. प्रारंभी कार्लेकर यांनी योजनेची आणि भारत सरकारच्या २००४ पासून जारी असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेद्वारे होणाऱ्या आर्थिक फायद्याची माहिती दिली. कार्लेकर म्हणाले, २००४ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अनिवार्य केली आहे. त्यानंतर २७ राज्यातील सरकारने या योजनेचा अवलंब केला. शासकीय नोकरीत नसलेल्यांना स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या ‘पार्इंट्स आॅफ प्रेजेन्स’ (पीओपी) च्या माध्यमातून योजनेचा फायदा घेऊ शकतात. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकासुद्धा पीओपीच्या स्वरूपात काम करीत आहेत. १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. यावेळी स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनच्या क्षेत्रीय व्यवस्थापक अर्चना जैन, शाखा व्यवस्थापक सोनल देशमुख, विपणन व्यवस्थापक रंजना घोडे, विपणन अधिकारी आशिष गंपावार आणि २०० पेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)