शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

सरसंघचालकांनी वर्तविली पाकिस्तानच्या फाळणीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:10 IST

आपल्या हक्काचा सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्याचे दु:ख सिंधी बांधवांमध्ये कायम असून ते १४ आॅगस्ट रोजी काळा दिवस साजरा करतात. मात्र पुढील २०-३० वर्षात चित्र बदलू शकते. हेच सिंधी बांधव प्रत्यक्ष सिंध भूमीवर उभे राहून गौरव दिवस साजरा करु शकतील, अशी शक्यता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वर्तविली.

ठळक मुद्देसिंध प्रांतात सिंधी बांधव करतील गौरवदिन साजरा : सिंधी संस्कृतीचे संवर्धन व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या हक्काचा सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्याचे दु:ख सिंधी बांधवांमध्ये कायम असून ते १४ आॅगस्ट रोजी काळा दिवस साजरा करतात. मात्र पुढील २०-३० वर्षात चित्र बदलू शकते. हेच सिंधी बांधव प्रत्यक्ष सिंध भूमीवर उभे राहून गौरव दिवस साजरा करु शकतील, अशी शक्यता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वर्तविली. अप्रत्यक्षपणे भविष्यात पाकिस्तानची फाळणी होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी या माध्यमातून बोलून दाखविली. भारतीय सिंधू सभेद्वारे श्री झुलेलाल भगवान यांचा जन्मोत्सव चेट्रीचंड्र साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान सोमवारी ते बोलत होते.जरीपटका येथील दयानंद पार्क येथे आयोजित या कार्यक्रमाला भारतीय सिंधू सभा अध्यक्ष घनश्यामदास कुकरेजा,मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेन्द्र कुकरेजा, अशोक केवलरामानी प्रामुख्याने उपस्थित होते. सिंधी बांधवांना शरणार्थी म्हणून संबोधले जाते. मात्र ते शरणार्थी नाहीत. संपूर्ण देश त्यांचेदेखील घर आहे. आपल्या राष्ट्रगीतातदेखील ‘सिंध’ शब्द आहे. १४ आॅगस्टच्या वेदना त्यांच्या मनात कायम आहेत. मात्र त्यांचा पुरुषार्थ व परमार्थ यांच्या बळावर आपल्या हक्काच्या सिंध प्रांतात उभे राहून १४ आॅगस्ट हा दिवस ते गौरवदिवस साजरे करु शकतील, अशी शक्यता डॉ.भागवत यांनी वर्तवली. आपल्या देशात सिंधू-सरस्वती संस्कृती आजही टिकून आहे. सिंधी भाषा मजबूत झाली तर भारताच्या इतर भाषादेखील मजबूत होतील. या भाषेची सुरक्षा म्हणजे देशाच्या संस्कृतीची सुरक्षा आहे. सिंधी समाजाचे योग्य संवर्धन झाले पाहिजे. यासाठी भाषा, वेषभूषा, भवन, भजन, भ्रमण आणि भोजन यांची परंपरा कायम राखली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले. घनश्यामदास कुकरेजा यांनी प्रास्ताविक केले. संगीता सचदेव यांनी संचलन केले.कुटुंबामध्ये मातृभाषेतूनच संवाद साधावाआजच्या काळात मातृभाषेची चिंता करण्याची वेळ आली आहे. जर आपली मातृभाषा टिकली तर इतर भाषादेखील टिकतील. त्यामुळे कुटुंबामध्ये संवाद साधताना मातृभाषेचाच वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी सरसंघचालकांनी केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत