शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

कोट्यवधी खर्चूनही तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: April 22, 2017 03:02 IST

शहराची शान समजल्या जाणाऱ्या तलावांचे अस्तित्व संकटात आहे. शहरातील लहान-मोठे दहा तलाव आहेत.

नागपूर : शहराची शान समजल्या जाणाऱ्या तलावांचे अस्तित्व संकटात आहे. शहरातील लहान-मोठे दहा तलाव आहेत. यातील काहींची स्थिती चिंताजनक झाली आहे. तर काही तलावांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यात पाणी साचलेले नाही. एकाही तलावाचे पाणी पिण्यायोग्य नाही. या तलावांना वेळीच प्रदूषणापासून वाचविण्यात आले नाही तर शहरात एकही तलाव उरणार नाही, असे चित्र आहे. तलावांची सफाई व पुनरुज्जीवनासाठी विविध प्रकल्प तयार करण्यात आले. राज्य सरकारतर्फे निधी जारी करण्यात आला. असे असले तरी स्थिती मात्र बदललेली नाही. जागतिक पृथ्वी दिनानिमित्त महापालिका, नासुप्रसोबतच नागरिकांनाही तलावांचे अस्तित्व वाचविण्यासाठी संकल्प करावा लागेल. महापालिका व स्वयंसेवी संस्थांतर्फे वेळोवेळी तलावांची स्वच्छता केली जाते. मात्र, तलावांची अंतर्गत सफाई व सौंदर्यीकरणावर पाहिजे त्या गंभीरतेने काम होताना दिसत नाही. फुटाळा तलावाला चौपाटीसारखे विकसित करण्यात आले. मात्र, परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. इतर तलावांचीही तशीच स्थिती आहे. गोरेवाडा तलावातून शहराला पाणीपुरवठा होतो. हा तलावदेखील प्रदूषण करणाऱ्यांपासून किती दिवस सुरक्षित राहील, हा एक मोठा चिंताजनक प्रश्न आहे. (प्रतिनिधी)