शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पावसामुळे वाडी शहरातील रस्त्यांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : सलग महिनाभरापासून मुसळधार पावसाच्या सरी बरसत असल्याने तसेच पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जात नसल्याने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : सलग महिनाभरापासून मुसळधार पावसाच्या सरी बरसत असल्याने तसेच पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जात नसल्याने वाडी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असून, छाेटेमाेठे अपघातही हाेत आहेत. यावर याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी केली जात आहे.

वाडी शहरातील बहुतांश वॉर्डातील अंतर्गत रस्त्याच्या निर्मिती व दुरुस्तीचे काम तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जवळपास पूर्ण झाले होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील सांडपाणी व छोट्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली हाेती. पावसाळ्यात आजार व समस्या डोके वर काढणार नाही यासाठी प्रयत्न करून नगर परिषद प्रशासनाने पूर्वनियोजन केले होते. महिनाभरापासून सतत पाऊस सुरू असल्याने शहरातील बहुतांश वॉर्डातील रस्त्यांवरील गिट्टी निघाली असून, रस्ते खड्डेमय झाले आहेत.

त्या खड्ड्यांमध्ये तसेच जागोजागी पाणी साचल्याने पायी चालताना व वाहन चालविताना नागरिकांना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. या प्रतिकूल वातावरणामुळे कीटकजन्य राेग बळावण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण दिसून येत आहे. जड वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यांची दैनावस्था झाली आहे, असेही नागरिकांनी सांगितले. येत्या काही दिवसात शाळामहाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना त्रास हाेणार असल्याने ते तातडीने बुजविण्यात यावेत, अशी मागणीही केली जात आहे.

...

शहरातील मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेवर करण्यात आली. डेंग्यूची लागण हाेऊ नये म्हणून साफसफाई तर काेराेनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून लसीकरणावर भर देत या दोन्ही आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. सततच्या पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून राहत आहे. यावर वेळीच याेग्य उपाययाेजना करून नागरिकांच्या समस्या साेडविल्या जातील.

- जुम्मा प्यारेवाले, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाडी

260921\img-20210926-wa0070.jpg

photo