शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पोलिंग पार्टी मतदान केंद्रांवर दाखल : २३ हजारावर कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:10 IST

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्व पोलिंग पार्टी (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) आपापल्या साहित्यासह बुधवारीच आपापल्या मतदान केद्रांवर दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी मतदान केंद्र तयार केले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ने मतदानास सुरुवात होईल. सकाळी ७ वाजेपासून नियमित मतदानास सुरुवात होईल. ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.

ठळक मुद्दे‘मॉक पोल’ने होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्व पोलिंग पार्टी (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) आपापल्या साहित्यासह बुधवारीच आपापल्या मतदान केद्रांवर दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी मतदान केंद्र तयार केले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ने मतदानास सुरुवात होईल. सकाळी ७ वाजेपासून नियमित मतदानास सुरुवात होईल. ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.बुधवारी सकाळपासूनच विधानसभानिहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम पसिरात ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट आदींसह निवडणूक मतदानाचे साहित्य वितरित करण्यात आले. पोलिंग पार्टी आपापल्या मतदाननिहाय साहित्य घेऊन रवाना झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 यासोबत पोलीस आणि इतर कर्मचारी वेगळे आहेत. सर्व कर्मचारी आपपल्या मतदान केंद्रावर पोहोचले असून, त्यांनी सायंकाळीच मतदान केंद्र तयार करून घेतले. सायंकाळी तसा अहवालही सादर केला. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीही मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली.सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदानमतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेत असलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर कुणालाही मतदान करता येणार नाही.जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम सुरक्षित पोहोचविणार 
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील. या कंटेनरवर जीपीएस व्यवस्था असेल. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना या कंटेनरचा पाठलागही करता येऊ शकेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवल्या जातील, तिथे कुठलीही लाईव्ह वायरिंग राहू नये. त्यामुळे येथे कुठल्याही प्रकारची वायरिंग नाही. आतमध्ये सीसीटीव्ही नाही. परंतु परिसरात मात्र सीसीटीव्ही आहेत. तसेच कळमना येथील दोन्ही स्ट्राँग रूम हे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने घेरलेले राहील.कळमना येथे मतमोजणी 
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागपूर व रामटेक या दोन्ही मतदार संघातील मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे दोन्ही मतदार संघासाठी दोन स्वतंत्र व्यवस्था आहे. कळमना येथील मतमोजणी केंद्राची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.एकूण मतदारनागपूर : २१, ६०,२३२रामटेक : १९,२१,०४७एकूण मतदान केंद्रनागपूर : २०५६रामटेक : २३६४एकूण कर्मचारी - दोन्ही मतदार संघात २३ हजार कर्मचारीपोस्टल बॅलेटदोन्ही मतदार संघात एकूण १९,५८० पोस्टल बॅलेट मतदार असून त्यापैकी रामटेक येथे १०,८४८ आणि नागपूरमध्ये ८,९३२ पोस्टल मतदार आहेत. या सर्वांना पोस्टल बॅलेट पाठवण्यात आलेले आहेत. निवडणूक विभागातर्फे निवडणूक कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्यासाठी सुविधा केंद्र उघडण्यात आले होते. यात १०१ लोकांनी मतदान केले. उर्वरित पोस्टल मतदाराला २३ मेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. परंतु २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत आपले पोस्टल मत संंबधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल, अशा पद्धतीने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल.अशी आहे वाहन व्यवस्था 
८०० जीप,५२० बसेस,१०० कार, १०० ट्रक,२४ कंटेनर ,२४ अ‍ॅम्बुलन्स आणि १३ अग्निशमन गाड्या

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019