शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

मानवी हस्तक्षेपामुळे परागीकरण धोक्यात

By admin | Updated: February 27, 2016 03:23 IST

परागीकरणाच्या गरजा पशु-पक्षी आणि कीटक यांच्याकडून होत असते. फुलं आणि फळे यांच्या उत्पादनात परागीकरण याचा मोठा वाटा असून हा एक नैसर्गिक भाग आहे.

आंबेडकर महाविद्यालय राष्ट्रीय परिषद : रेनी बोर्गीज यांचे प्रतिपादननागपूर : परागीकरणाच्या गरजा पशु-पक्षी आणि कीटक यांच्याकडून होत असते. फुलं आणि फळे यांच्या उत्पादनात परागीकरण याचा मोठा वाटा असून हा एक नैसर्गिक भाग आहे. यात मानवी हस्तक्षेप सध्या कमी असला तरी मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परागीकरण घडवून आणणारे घटक नामशेष होत आहे. परिणामी नैसर्गिक परागीकरणच धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन बंगळुरु येथील इकॉलॉजिकल सायन्सेस सेंटरचे अध्यक्ष डॉ. रेनी बोर्गीज यांनी येथे केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीतर्फे केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर व राष्ट्रीय विज्ञान परिषद नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनॅशनल इयर आॅफ पल्सेस-२०१६’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ‘इनोव्हेशन इन अ‍ॅग्री-बायोसायन्सेस’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. केशव क्रांती, डॉ. सुधोमय मंडल, डॉ. अलका चतुर्वेदी, प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. डी. बेगडे, प्रो. सुभाष सोमकुंवर, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, व्ही.व्ही. चिकाटे व्यासपीठावर हजर होते. डॉ. शरद निंबाळकर यांनी हरित क्रांतीवर भर दिला. कृषी क्षेत्रातील नैसर्गिक घटकांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक प्रो. सुभाष सोमकुंवर यांनी केले. डॉ. वर्षा देशपांडे यांनी संचालन केले. डॉ. भूमी मेहरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)