शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

मानवी हस्तक्षेपामुळे परागीकरण धोक्यात

By admin | Updated: February 27, 2016 03:23 IST

परागीकरणाच्या गरजा पशु-पक्षी आणि कीटक यांच्याकडून होत असते. फुलं आणि फळे यांच्या उत्पादनात परागीकरण याचा मोठा वाटा असून हा एक नैसर्गिक भाग आहे.

आंबेडकर महाविद्यालय राष्ट्रीय परिषद : रेनी बोर्गीज यांचे प्रतिपादननागपूर : परागीकरणाच्या गरजा पशु-पक्षी आणि कीटक यांच्याकडून होत असते. फुलं आणि फळे यांच्या उत्पादनात परागीकरण याचा मोठा वाटा असून हा एक नैसर्गिक भाग आहे. यात मानवी हस्तक्षेप सध्या कमी असला तरी मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परागीकरण घडवून आणणारे घटक नामशेष होत आहे. परिणामी नैसर्गिक परागीकरणच धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन बंगळुरु येथील इकॉलॉजिकल सायन्सेस सेंटरचे अध्यक्ष डॉ. रेनी बोर्गीज यांनी येथे केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीतर्फे केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर व राष्ट्रीय विज्ञान परिषद नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनॅशनल इयर आॅफ पल्सेस-२०१६’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ‘इनोव्हेशन इन अ‍ॅग्री-बायोसायन्सेस’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. केशव क्रांती, डॉ. सुधोमय मंडल, डॉ. अलका चतुर्वेदी, प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. डी. बेगडे, प्रो. सुभाष सोमकुंवर, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, व्ही.व्ही. चिकाटे व्यासपीठावर हजर होते. डॉ. शरद निंबाळकर यांनी हरित क्रांतीवर भर दिला. कृषी क्षेत्रातील नैसर्गिक घटकांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक प्रो. सुभाष सोमकुंवर यांनी केले. डॉ. वर्षा देशपांडे यांनी संचालन केले. डॉ. भूमी मेहरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)