शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

राजकारण अतृप्त आत्म्यांचा महासागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:12 IST

राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. ज्यांना मिळाले तेच अतृप्त असतात. आणखी काही मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतात तर ज्यांना काहीच मिळाले नाही, ते मात्र खºया अर्थाने तृप्त असतात.

ठळक मुद्देनितीन गडकरी : मनीष अवस्थी व अशोक वानखेडे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. ज्यांना मिळाले तेच अतृप्त असतात. आणखी काही मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतात तर ज्यांना काहीच मिळाले नाही, ते मात्र खºया अर्थाने तृप्त असतात. समाजात चांगले काम करणाºयांचा सत्कार होत नाही आणि चुकीचे काम करणाºयांना शिक्षा मिळत नाही, हीच खºया अर्थाने समाजातील समस्या आहे, असे रोखठोक मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी आणि स्तंभलेखक व एबीपी न्यूज वाहिनीवरील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांना शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पुरस्कार-२०१६ प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी गडकरी बोलत होते. पंचशील चौक धंतोली येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे होते. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय कुवळेकर हे प्रमुख अतिथी होते. गिरीश गांधी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर व पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व्यासपीठावर होते.नितीन गडकरी म्हणाले, राजकारण म्हणजे केवळ सत्ता स्थापन करणे नव्हे. राजकारणाची ही व्याख्या बदलायला हवी. समाजकारण हेच राजकारण झाले पाहिजे. जी व्यक्ती आपला कामधंदा व घरदार व्यवस्थित सांभाळू शकत नाही, ती देशाची सेवाही करू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही सत्कारमूर्ती हे आपले चांगले मित्र आहेत. आपल्या माणसाचा सत्कार होत असल्याचा आनंद आहे. दिल्लीमध्ये विदर्भातील पत्रकार मंडळी आपल्या माणसांची काळजी घेतात. राजकारणावर आपली मते ताकदीने मांडतात, पण तितकीच काळजी सुद्धा घेत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.विजय कुवळेकर यांनी प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेवर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सांगून समाजात चे जांगले आहे, ते दिसू द्या असे आवाहन केले.माझ्या जिवंतपणी विदर्भ राज्य करून द्याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात दिल्ली आणि मुंबई नागपुरात आहेत. त्यामुळे आता माझ्या जिवंतपणी तरी विदर्भ राज्य करून द्या’, असे भावनिक आवाहन केले.