शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

नाट्य संमेलनात राजकारणच जास्त

By admin | Updated: April 28, 2017 02:59 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर नाटकाचे नव्हे तर राजकारणाचे प्रयोग होतात.

भाऊ कदम : नाट्य परिषदेच्या कारभारावर व्यक्त केला संताप नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर नाटकाचे नव्हे तर राजकारणाचे प्रयोग होतात. नाट्य परिषदेला समर्पित रंगकर्मींशी काही घेणे-देणे नाही. म्हणूनच नाट्य कलावंत अशा संमेलनांकडे फिरकत नाहीत, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केली. नवरंग क्रिएशन्सतर्फे गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाट्य परिषदेच्या एककल्ली कारभारावर संताप व्यक्त करीत भाऊ कदम पुढे म्हणाले, अशा संमेलनांमध्ये नाट्य परिषदेचे अधिकारी आपल्या नातेवाईकांनाच पुढे-पुढे करतात. सभागृहातील समोरच्या अनेक रांगा व्हीआयपींसाठी राखीव असतात. हे व्हीआयपी कोण आहेत? ज्या माय-बाप प्रेक्षकांमुळे नाटक चालते त्यांना या व्हीआयपी जागेवर का बसवले जात नाही? सेलिब्रिटी कलावंत नाटकाला येत नाहीत, असा आरोप केला जातो. परंतु संमेलनाची तारीख ठरवताना किती कलावंतांना विश्वासात घेतले जाते. प्रत्येकाचे वेळापत्रक निश्चित असते अन् मधेच हे संमेलन उभे राहते. तारखांचे पूर्व नियोजन का केले जात नाही? उगाच कलावंतांना दोष देऊन उपयोग नाही, याकडेही भाऊ कदम यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी) कंत्राटदाराला नेपथ्याचे काय कळते? राज्यात आधीच नाट्यगृहांची स्थिती फार वाईट आहे. त्यातही नाट्यगृह बांधताना नेपथ्याच्या दृष्टीने अजिबात विचार करण्यात न आल्याने नाटक सादर करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. असे नाट्यगृह बांधताना सर्व कंत्राटदारावर सोपवले जाते. पण, त्याला नाटकाच्या नेपथ्याबाबत काहीच माहीत नसते. त्यामुळे यापुढे नाट्यगृह बांधताना नेपथ्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तीचा सल्ला घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही भाऊ कदम यांनी व्यक्त केली.