शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण, समाजकारणातील मूल्य शिकविणारा लोकनेता

By admin | Updated: September 26, 2016 03:10 IST

सत्तेच्या विरुद्ध नि:शस्त्र क्रांती करणाऱ्या जागतिक स्तराच्या नेत्यांपैकी जयप्रकाश नारायण एक होते.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे प्रतिपादन : जयप्रकाश नारायण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणनागपूर : सत्तेच्या विरुद्ध नि:शस्त्र क्रांती करणाऱ्या जागतिक स्तराच्या नेत्यांपैकी जयप्रकाश नारायण एक होते. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात जोपासलेली मूल्ये आणि चारित्र्याच्या भरवशावर सत्तेच्या विरुद्ध लोकचळवळी उभारल्या. त्यांनी या लढ्यांमधून राजकारण आणि समाजकारणातील मूल्ये या देशाला शिकविली आहेत. मात्र दुर्दैवाने आजच्या राजकारण्यांनी ही मूल्ये जोपासली नसल्याची खंत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.अमरावती रोड, बोले पेट्रोलपंप जवळील सर्वोदय आश्रमात रविवारी लोकनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, डॉ. सुरेश पांढरीपांडे, अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी, डॉ. नलिनी निसळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्या. धर्माधिकारी यांनी जेपी यांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून त्यांच्या कार्याची महती वर्णन केली. तरुणांना भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात जोपासलेली मूल्ये समाजकारणातही पाळली. बिहारमध्ये केलेला लढा असो की आणीबाणीच्या काळात सत्तेविरुद्ध उभा केलेला संघर्ष असो, त्यांच्या स्वच्छ व प्रामाणिक चारित्र्यामुळे लोक आपोआपच त्यांच्या लढ्यात सहभागी झाले. लोकलढा उभारण्याच्या त्यांच्या कर्तृत्वामुळे सर्वच पक्षातील मोठ्या नेत्यांवर त्यांचा प्रभाव होता. मात्र त्यांच्या नम्रतेपुढे हे सर्व फोल होते. सर्वोदय आश्रमातील गांधीजी, विनोबा व जेपी यांचे पुतळे मूल्यांचे संदेश देणारे ठरतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी, एक नेता सरकारविरुद्ध उभा राहतो आणि अख्खा देश त्यांच्या मागे येतो ही जेपींच्या कर्तृत्वाचे मोठेपण सांगण्यासाठी पुरेसे असल्याचे मनोगत व्यक्त केले. जेपींचा राजकीय आणि वैचारिक प्रवास मोठा होता आणि त्यांचे कार्य व्यापक होते. जेपी यांच्यावर महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासह मार्क्सवाद व समाजवादाचाही प्रभाव होता. मात्र जेपी कोणत्याही विचारांच्या चौकटीत अडकले नाही. त्यांनी चौकटीबाहेरचे विचार मांडले. जनता नि:शस्त्र लढा देणाऱ्या नेतृत्वाच्या बरोबरीने उभी राहते. गांधीजीनंतर जेपींनी अनेक नि:शस्त्र लढे यशस्वी केले. कामगारांनंतर शेतकऱ्यांचा लढा उभा होईल. मात्र हा भांडवलदाराविरुद्ध नाही तर ग्रामीण लोक शहरांविरुद्ध घेराव घालतील. तेव्हा शोषितांच्या हातून क्रांती होण्याआधी त्यांचे शोषण थांबविले पाहिजे, असा विचार जेपींनी मांडला होता. ६० व ७० च्या दशकात तरुण जेपींच्या नावाने भारावले होते. सर्व पक्षांच्या नेत्यांवर त्यांचा प्रभाव होता. त्यांनी उभारलेल्या लोकलढ्यातून आणि चारित्र्यातून हा प्रभाव निर्माण केला. मात्र सध्याच्या काळात स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे कार्य पुसून टाकण्याचे राजकारण केले जात असल्याची खंत द्वादशीवार यांनी व्यक्त केली. दलितांना दडपण्याचे आणि अल्पसंख्यांकांना भीती दाखविण्याचे राजकारण होत आहे. अशावेळी पुतळ्याच्या माध्यमातून का होईना, लोकनायकाच्या क्रांतिकारी स्मृती उभ्या राहणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दमयंती पांढरीपांडे व संचालन डॉ. कल्पना तिवारी यांनी केले. सर्वोदय आश्रमाच्या सचिव विशाखा बागडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्यावेळी हरिभाऊ केदार, हरिभाऊ नाईक, अ‍ॅड. राजेंद्र राठी, प्रा. सुरेखा देवधर, ए. आर. पांडे, रवींद्र गुडधे, दीपमाला कुबडे, डॉ. प्रकाश पाटील, बाळविजय, मा.म. गडकरी, डॉ. अनिल वाघ, विलास भोंगाडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)