शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

भाजपची वारी, काँग्रेस मतदार घरी; सेना, राष्ट्रवादी वारीसाठी शोधतेय कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 3:34 PM

भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे. मात्र, काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

ठळक मुद्देभाजपच्या मतदारांची आवभगतमहाविकास आघाडीचे प्रतीक्षेत

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी ठेवलेल्या अपक्षेवर पाणी फेरल्या जात असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाच्या मतदारांना सहकुटुंब वारीला पाठविले आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराकडून वारीबद्दल कुठलेही नियोजन नसल्याने काँग्रेसचे मतदार अजूनही घरीच आहे. यात मात्र चांगलीच घुसपट सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांची झाली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे मतदार असा ऐब मारणारे सेना राष्ट्रवादीच्या मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांकडून अद्यापही सन्मान मिळाला नसल्याने किमान वारी तरी घडावी यासाठी कारभारी शोधत आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे भाजपचे आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे मतदार आहे. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २० ते २५ मतदार आहेत. काँग्रेसने उमेदवार देताना महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याची घोषणा केली होती. परंतु ना सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले, ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली.

भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीचे प्लॅनिंग आखले. आपल्या पक्षाचे जे मतदार अवघड ठरू शकतात. त्यांना लगेच हेरून चांगल्या पॅकेजच्या वारीवर पाठविले. त्यानंतर गटागटाने पक्षाच्या मतदारांना त्यांच्यात्यांच्या आवडीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे.

मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने अजूनही पक्षाच्या मतदाराचेच नियोजन केले नाही. काँग्रेसचे तालुका तालुक्यातील मतदार गठ्ठ्याने एकत्र राहत आहे. आपल्यालाही वारीची संधी मिळेल किंवा काही सूचना येतील याच्या प्रतिक्षेत सद्या घरातच बसून आहे. काँग्रेसच्याच सदस्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यागत असल्याने राष्ट्रवादी व सेनेच्या मतदारांचा मान सन्मान दूरचाच आहे. दोन्ही पक्षाच्या मतदारांचे आपापल्या नेत्यांच्या सूचनांकडे लक्ष लागून आहे. काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराने घेतला आहे. आपले मतदार वारीवर पाठवून आता भाजपचे उमेदवार काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतदाराच्या संपर्कात आहे. त्यांच्या घरी चहासाठी येत असल्याचे सांगून घरी जावून भेटी घेत आहे. मोठ्या विनम्रतेने सद्या उमेदवाराकडून विनंती केली जात आहे. त्यामुळे सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये भाजपाच्या उमेदवाराबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली आहे. ही सहानुभूती मतांच्या माध्यमातून निवडणुकीत दिसून आल्यास त्यांनाही कुठेतरी मानसन्मान मिळाला हेच दिसून येईल.

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक