शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

भाजपची वारी, काँग्रेस मतदार घरी; सेना, राष्ट्रवादी वारीसाठी शोधतेय कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 10:20 IST

भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे. मात्र, काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

ठळक मुद्देभाजपच्या मतदारांची आवभगतमहाविकास आघाडीचे प्रतीक्षेत

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी ठेवलेल्या अपक्षेवर पाणी फेरल्या जात असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाच्या मतदारांना सहकुटुंब वारीला पाठविले आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराकडून वारीबद्दल कुठलेही नियोजन नसल्याने काँग्रेसचे मतदार अजूनही घरीच आहे. यात मात्र चांगलीच घुसपट सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांची झाली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे मतदार असा ऐब मारणारे सेना राष्ट्रवादीच्या मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांकडून अद्यापही सन्मान मिळाला नसल्याने किमान वारी तरी घडावी यासाठी कारभारी शोधत आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे भाजपचे आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे मतदार आहे. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २० ते २५ मतदार आहेत. काँग्रेसने उमेदवार देताना महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याची घोषणा केली होती. परंतु ना सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले, ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली.

भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीचे प्लॅनिंग आखले. आपल्या पक्षाचे जे मतदार अवघड ठरू शकतात. त्यांना लगेच हेरून चांगल्या पॅकेजच्या वारीवर पाठविले. त्यानंतर गटागटाने पक्षाच्या मतदारांना त्यांच्यात्यांच्या आवडीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे.

मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने अजूनही पक्षाच्या मतदाराचेच नियोजन केले नाही. काँग्रेसचे तालुका तालुक्यातील मतदार गठ्ठ्याने एकत्र राहत आहे. आपल्यालाही वारीची संधी मिळेल किंवा काही सूचना येतील याच्या प्रतिक्षेत सद्या घरातच बसून आहे. काँग्रेसच्याच सदस्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यागत असल्याने राष्ट्रवादी व सेनेच्या मतदारांचा मान सन्मान दूरचाच आहे. दोन्ही पक्षाच्या मतदारांचे आपापल्या नेत्यांच्या सूचनांकडे लक्ष लागून आहे. काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराने घेतला आहे. आपले मतदार वारीवर पाठवून आता भाजपचे उमेदवार काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतदाराच्या संपर्कात आहे. त्यांच्या घरी चहासाठी येत असल्याचे सांगून घरी जावून भेटी घेत आहे. मोठ्या विनम्रतेने सद्या उमेदवाराकडून विनंती केली जात आहे. त्यामुळे सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये भाजपाच्या उमेदवाराबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली आहे. ही सहानुभूती मतांच्या माध्यमातून निवडणुकीत दिसून आल्यास त्यांनाही कुठेतरी मानसन्मान मिळाला हेच दिसून येईल.

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक