शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भाजपची वारी, काँग्रेस मतदार घरी; सेना, राष्ट्रवादी वारीसाठी शोधतेय कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 10:20 IST

भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे. मात्र, काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

ठळक मुद्देभाजपच्या मतदारांची आवभगतमहाविकास आघाडीचे प्रतीक्षेत

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी ठेवलेल्या अपक्षेवर पाणी फेरल्या जात असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाच्या मतदारांना सहकुटुंब वारीला पाठविले आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराकडून वारीबद्दल कुठलेही नियोजन नसल्याने काँग्रेसचे मतदार अजूनही घरीच आहे. यात मात्र चांगलीच घुसपट सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांची झाली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे मतदार असा ऐब मारणारे सेना राष्ट्रवादीच्या मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांकडून अद्यापही सन्मान मिळाला नसल्याने किमान वारी तरी घडावी यासाठी कारभारी शोधत आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे भाजपचे आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे मतदार आहे. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २० ते २५ मतदार आहेत. काँग्रेसने उमेदवार देताना महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याची घोषणा केली होती. परंतु ना सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले, ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली.

भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीचे प्लॅनिंग आखले. आपल्या पक्षाचे जे मतदार अवघड ठरू शकतात. त्यांना लगेच हेरून चांगल्या पॅकेजच्या वारीवर पाठविले. त्यानंतर गटागटाने पक्षाच्या मतदारांना त्यांच्यात्यांच्या आवडीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे.

मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने अजूनही पक्षाच्या मतदाराचेच नियोजन केले नाही. काँग्रेसचे तालुका तालुक्यातील मतदार गठ्ठ्याने एकत्र राहत आहे. आपल्यालाही वारीची संधी मिळेल किंवा काही सूचना येतील याच्या प्रतिक्षेत सद्या घरातच बसून आहे. काँग्रेसच्याच सदस्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यागत असल्याने राष्ट्रवादी व सेनेच्या मतदारांचा मान सन्मान दूरचाच आहे. दोन्ही पक्षाच्या मतदारांचे आपापल्या नेत्यांच्या सूचनांकडे लक्ष लागून आहे. काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराने घेतला आहे. आपले मतदार वारीवर पाठवून आता भाजपचे उमेदवार काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतदाराच्या संपर्कात आहे. त्यांच्या घरी चहासाठी येत असल्याचे सांगून घरी जावून भेटी घेत आहे. मोठ्या विनम्रतेने सद्या उमेदवाराकडून विनंती केली जात आहे. त्यामुळे सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये भाजपाच्या उमेदवाराबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली आहे. ही सहानुभूती मतांच्या माध्यमातून निवडणुकीत दिसून आल्यास त्यांनाही कुठेतरी मानसन्मान मिळाला हेच दिसून येईल.

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक