शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

भाजपची वारी, काँग्रेस मतदार घरी; सेना, राष्ट्रवादी वारीसाठी शोधतेय कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 10:20 IST

भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे. मात्र, काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

ठळक मुद्देभाजपच्या मतदारांची आवभगतमहाविकास आघाडीचे प्रतीक्षेत

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी ठेवलेल्या अपक्षेवर पाणी फेरल्या जात असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाच्या मतदारांना सहकुटुंब वारीला पाठविले आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराकडून वारीबद्दल कुठलेही नियोजन नसल्याने काँग्रेसचे मतदार अजूनही घरीच आहे. यात मात्र चांगलीच घुसपट सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांची झाली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे मतदार असा ऐब मारणारे सेना राष्ट्रवादीच्या मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांकडून अद्यापही सन्मान मिळाला नसल्याने किमान वारी तरी घडावी यासाठी कारभारी शोधत आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे भाजपचे आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे मतदार आहे. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २० ते २५ मतदार आहेत. काँग्रेसने उमेदवार देताना महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याची घोषणा केली होती. परंतु ना सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले, ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली.

भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीचे प्लॅनिंग आखले. आपल्या पक्षाचे जे मतदार अवघड ठरू शकतात. त्यांना लगेच हेरून चांगल्या पॅकेजच्या वारीवर पाठविले. त्यानंतर गटागटाने पक्षाच्या मतदारांना त्यांच्यात्यांच्या आवडीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे.

मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने अजूनही पक्षाच्या मतदाराचेच नियोजन केले नाही. काँग्रेसचे तालुका तालुक्यातील मतदार गठ्ठ्याने एकत्र राहत आहे. आपल्यालाही वारीची संधी मिळेल किंवा काही सूचना येतील याच्या प्रतिक्षेत सद्या घरातच बसून आहे. काँग्रेसच्याच सदस्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यागत असल्याने राष्ट्रवादी व सेनेच्या मतदारांचा मान सन्मान दूरचाच आहे. दोन्ही पक्षाच्या मतदारांचे आपापल्या नेत्यांच्या सूचनांकडे लक्ष लागून आहे. काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.

याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराने घेतला आहे. आपले मतदार वारीवर पाठवून आता भाजपचे उमेदवार काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतदाराच्या संपर्कात आहे. त्यांच्या घरी चहासाठी येत असल्याचे सांगून घरी जावून भेटी घेत आहे. मोठ्या विनम्रतेने सद्या उमेदवाराकडून विनंती केली जात आहे. त्यामुळे सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये भाजपाच्या उमेदवाराबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली आहे. ही सहानुभूती मतांच्या माध्यमातून निवडणुकीत दिसून आल्यास त्यांनाही कुठेतरी मानसन्मान मिळाला हेच दिसून येईल.

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक