शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

महाराष्ट्रातदेखील होऊ शकतो राजकीय भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 15:55 IST

उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देमोदींवरील टीकेमुळे राहुल गांधींची प्रतिमा खराब होतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यप्रदेशमध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटू शकतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात ते काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा अपमान कधीही सहन केला नसता. उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सोमवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया यांना आम्ही फोडलेले नाही. भाजपला कोणालाही फोडण्याची आवश्यकता नाही. मध्यपदेशमध्ये कमलनाथ सरकार अल्पमतात आहे. परंतु त्यांना बहुमत चाचणीसाठी वेळ मिळाला. त्यांच्याप्रमाणे बहुमत सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जास्त वेळ मिळाला असता तर चित्र वेगळे राहू शकते, असे रामदास आठवले म्हणाले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनावश्यक टीका करत असल्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होत आहे, असे मतदेखील आठवले यांनी व्यक्त केले. केंद्राने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.बाबासाहेबांच्या स्मारकाला अधिकृत परवानगीलंडन येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानी स्मारक उभारण्यात आले. मात्र याविरोधात काही लोक न्यायालयात गेले. या स्मारकाला अधिकृत परवानगी असल्याचे लंडन प्रशासनाने केंद्रीय मंत्रालयाला कळविले आहे. याबाबतीत त्यांनी मागील आठवड्यातच पत्र पाठविल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.बाबासाहेब कधीच ब्राह्मणांविरोधात नव्हतेडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कधीच ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. त्यांच्या चळवळीत अनेक ब्राह्मण सोबत होते. राज्यातील मंत्री नितीन राऊत यांच्याकडून ब्राह्मणांबाबत जातीवाचक वक्तव्य अपेक्षित नव्हते. अशी भाषा वापरणे अयोग्य आहे. त्यांच्यावर कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असे रामदास आठवले म्हणाले. राऊत यांचा रोख ब्राह्मणांपेक्षा भाजपावर असू शकतो. परंतु भाजप बहुजनांचादेखील पक्ष आहे हे राऊत यांनी लक्षात घ्यावे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.‘कोरोना’के बजा दुंगा बारामी ‘गो कोरोना’ची घोषणा दिली, त्याची अनेकांनी टिंगल टवाळी केली. मात्र ‘कोरोना’ खरोखरच गेला पाहिजे. यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी. सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे, असे आठवले यांनी आवाहन केले. ‘कोरोना गो का मैने ये दे दिया था नारा...इस लिए जाग गया था भारत सारा. कोरोना ये 110 देश मे चमक रहा है सारा..कोरोना बहुत देश मे चमक रहा है सारा...मै एक दिन बजा दुगा कोरोना के बारा’ या कवितेच्या ओळीच त्यांनी सादर केल्या.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले