शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश वटलाच नाही फसवणूक प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: May 6, 2016 03:12 IST

२०१० मध्ये राजू प्यारेलाल जयस्वाल, विजय शंकर तालेवार, गोपाल भिवाजी अंगलेकर, तुशांत किसन नंदागवळी आणि शंकर ठाकरे यांनी संगनमत करून

नागपूर : २०१० मध्ये राजू प्यारेलाल जयस्वाल, विजय शंकर तालेवार, गोपाल भिवाजी अंगलेकर, तुशांत किसन नंदागवळी आणि शंकर ठाकरे यांनी संगनमत करून रामदास भोयर यांच्या एक एकर जमिनीचा १५ लाख रुपयांत सौदा केला. पाच लाख रोख आणि विजय तालेवार यांनी भोयर यांना धनादेशाद्वारे दहा लाख रुपये दिले, असे व्यवहारात दाखवण्यात आले. दहा लाखांचा हा धनादेश वटलाच नाही. विशेष म्हणजे, जमीन खरेदीच्या या व्यवहाराची वृत्तपत्रात जाहीर सूचना देण्यात आली. ती वाचण्यात आल्यामुळे भोयर यांची पत्नी विजया यांनी या व्यवहारावर आक्षेप घेतला. त्या आणि त्यांची मुले जमिनीचे कायदेशीर वारस असतानादेखिल त्यांच्या आक्षेपाला बेदखल करीत आरोपींनी ३१ जुलै २०१० ला सदरमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विक्रीपत्र तयार करून घेतले. परिणामी फेब्रुवारी २०११ मध्ये सदर पोलीस ठाण्यात त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकाने थातूरमातूर तपास करून 'अ समरी' अहवाल तयार केला. पोलिसांकडून झिडकारण्यात आल्यामुळे एकाकी अन् हतबल झालेल्या विजया भोयर यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला. मनोरुग्ण व्यक्तीशी केलेला व्यवहार ग्राह्य धरता येत नाही. फसवणूक करण्याच्या उद्देशानेच आरोपींनी कटकारस्थान रचून हा व्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे मंगळवारी रात्री पोलिसांनी निडोज बारचा मालक राजू जयस्वाल, गोपाल अंगलेकर, तुषांत नंदागवळी आणि शंकर ठाकरे या चार आरोपींना अटक केली. तर कारवाईची कुणकुण लागताच तालेवार फरार झाला. बुधवारी दुपारी अटकेतील आरोपींना गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात हजर करून ११ मे पर्यंत पोलीस कोठडी मागितली. मात्र, प्रकरणाच्या तपासातील कागदोपत्री त्रुटी अन् पोलिसांचा जुजबी स्वरूपाचा युक्तिवाद लक्षात घेऊन कोर्टाने पीसीआरची मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वकिलांनी लगेच जामिनाकरिता अर्ज सादर केला. त्यामुळे चौघांचाही जामीन मंजूर करण्यात आला. दोषारोपपत्र लवकरच : उपायुक्त मासिरकर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, गुन्ह्याचे स्वरूप आणि आरोपीच्या अटकेचे काही नियम आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. तपासात फसवणूक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्ही आरोपींना अटक केली. एक आरोपी अद्यापही फरार असून, त्यालाही लवकरच अटक करू. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, कोर्टात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी दिली.