शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

धनादेश वटलाच नाही फसवणूक प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: May 6, 2016 03:12 IST

२०१० मध्ये राजू प्यारेलाल जयस्वाल, विजय शंकर तालेवार, गोपाल भिवाजी अंगलेकर, तुशांत किसन नंदागवळी आणि शंकर ठाकरे यांनी संगनमत करून

नागपूर : २०१० मध्ये राजू प्यारेलाल जयस्वाल, विजय शंकर तालेवार, गोपाल भिवाजी अंगलेकर, तुशांत किसन नंदागवळी आणि शंकर ठाकरे यांनी संगनमत करून रामदास भोयर यांच्या एक एकर जमिनीचा १५ लाख रुपयांत सौदा केला. पाच लाख रोख आणि विजय तालेवार यांनी भोयर यांना धनादेशाद्वारे दहा लाख रुपये दिले, असे व्यवहारात दाखवण्यात आले. दहा लाखांचा हा धनादेश वटलाच नाही. विशेष म्हणजे, जमीन खरेदीच्या या व्यवहाराची वृत्तपत्रात जाहीर सूचना देण्यात आली. ती वाचण्यात आल्यामुळे भोयर यांची पत्नी विजया यांनी या व्यवहारावर आक्षेप घेतला. त्या आणि त्यांची मुले जमिनीचे कायदेशीर वारस असतानादेखिल त्यांच्या आक्षेपाला बेदखल करीत आरोपींनी ३१ जुलै २०१० ला सदरमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विक्रीपत्र तयार करून घेतले. परिणामी फेब्रुवारी २०११ मध्ये सदर पोलीस ठाण्यात त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकाने थातूरमातूर तपास करून 'अ समरी' अहवाल तयार केला. पोलिसांकडून झिडकारण्यात आल्यामुळे एकाकी अन् हतबल झालेल्या विजया भोयर यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला. मनोरुग्ण व्यक्तीशी केलेला व्यवहार ग्राह्य धरता येत नाही. फसवणूक करण्याच्या उद्देशानेच आरोपींनी कटकारस्थान रचून हा व्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे मंगळवारी रात्री पोलिसांनी निडोज बारचा मालक राजू जयस्वाल, गोपाल अंगलेकर, तुषांत नंदागवळी आणि शंकर ठाकरे या चार आरोपींना अटक केली. तर कारवाईची कुणकुण लागताच तालेवार फरार झाला. बुधवारी दुपारी अटकेतील आरोपींना गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात हजर करून ११ मे पर्यंत पोलीस कोठडी मागितली. मात्र, प्रकरणाच्या तपासातील कागदोपत्री त्रुटी अन् पोलिसांचा जुजबी स्वरूपाचा युक्तिवाद लक्षात घेऊन कोर्टाने पीसीआरची मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वकिलांनी लगेच जामिनाकरिता अर्ज सादर केला. त्यामुळे चौघांचाही जामीन मंजूर करण्यात आला. दोषारोपपत्र लवकरच : उपायुक्त मासिरकर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, गुन्ह्याचे स्वरूप आणि आरोपीच्या अटकेचे काही नियम आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. तपासात फसवणूक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्ही आरोपींना अटक केली. एक आरोपी अद्यापही फरार असून, त्यालाही लवकरच अटक करू. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, कोर्टात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी दिली.