शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पोलिसांच्या सुट्या आजपासून रद्द : उपराजधानीत चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:45 IST

१० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अयोध्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये म्हणून पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे.

ठळक मुद्देईद-ए-मिलाद आणि अयोध्या निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अयोध्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये म्हणून पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच ठिकाणच्या पोलिसांच्या सुट्या ५ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत़ तसेच आदेश पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून शनिवारी रात्री सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना तसेच घटकप्रमुखांना देण्यात आले आहे़ नागपुरातही कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.सरकार स्थापन करण्याच्या विषयावरून राज्यात एक वेगळे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे़ चार दिवसांवर ईद-ए-मिलादचा सण आला आहे. तर, त्यानंतर एकाच आठवड्यात देश-विदेशाचे लक्ष लागलेला अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईत शनिवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला़ त्यानंतर सर्वांना अतिसतर्कतेच्या उपाययोजना आखण्याचे आदेश देण्यात आले. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ऐनवेळी धावपळ नको म्हणून पुढच्या आदेशापर्यंत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा देण्यात येऊ नये, जे रजेवर गेलेले आहेत, त्यांना बोलवून घ्यावे, असे सूचनावजा आदेशही देण्यात आले आहेत.नागपूर हे देशाचे हृदयस्थळ आहे. संघ मुख्यालय, दीक्षाभूमी या अतिमहत्त्वाच्या स्थळांमुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहनगर म्हणूनही नागपूर शहराची देशात वेगळी ओळख आहे. सर्वधर्मसमभाव जपणारे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. मात्र, अधूनमधून येथे घडणाºया घडामोडीही लक्षवेधी असतात. देशाच्या सुरक्षेत अतिमहत्त्वाचे स्थान असलेल्या ब्रह्मोस प्रकल्पातील एका अभियंत्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी अटक झाली होती. त्यात देशभर खळबळ निर्माण करणाºया लखनौच्या (उत्तर प्रदेश) कमलेश तिवारी हत्याकांडात लखनौ तसेच स्थानिक एटीएसने सईद आसिम नामक तरुणाला अटक केली. अयोध्या निकालानंतरही काही उपद्रवी मंडळी अफवा पसरवून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशा गुप्त सूचना आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्हा पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी शांतता समितीची बैठक घेऊन शहराच्या प्रतिष्ठेला समाजकंटकाकडून गालबोट लावले जाणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली.सर्व काही सुरळीत : पोलीस आयुक्तपोलिसांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही. कोणत्या समाजकंटकाकडून तसा प्रयत्न झाला तर त्याला धडा शिकविण्यासाठी शहर पोलीस सज्ज आहेत. मात्र, तशी वेळ नागपुरात येणार नाही. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जाणारे शहर म्हणून देशात नागपूरची ख्याती आहे. येथील सर्वच जाती-धर्मातील मंडळी एकोप्याने राहतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नसल्याचा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस