शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पोलिसांच्या सुट्या आजपासून रद्द : उपराजधानीत चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:45 IST

१० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अयोध्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये म्हणून पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे.

ठळक मुद्देईद-ए-मिलाद आणि अयोध्या निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अयोध्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये म्हणून पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच ठिकाणच्या पोलिसांच्या सुट्या ५ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत़ तसेच आदेश पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून शनिवारी रात्री सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना तसेच घटकप्रमुखांना देण्यात आले आहे़ नागपुरातही कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.सरकार स्थापन करण्याच्या विषयावरून राज्यात एक वेगळे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे़ चार दिवसांवर ईद-ए-मिलादचा सण आला आहे. तर, त्यानंतर एकाच आठवड्यात देश-विदेशाचे लक्ष लागलेला अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईत शनिवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला़ त्यानंतर सर्वांना अतिसतर्कतेच्या उपाययोजना आखण्याचे आदेश देण्यात आले. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ऐनवेळी धावपळ नको म्हणून पुढच्या आदेशापर्यंत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा देण्यात येऊ नये, जे रजेवर गेलेले आहेत, त्यांना बोलवून घ्यावे, असे सूचनावजा आदेशही देण्यात आले आहेत.नागपूर हे देशाचे हृदयस्थळ आहे. संघ मुख्यालय, दीक्षाभूमी या अतिमहत्त्वाच्या स्थळांमुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहनगर म्हणूनही नागपूर शहराची देशात वेगळी ओळख आहे. सर्वधर्मसमभाव जपणारे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. मात्र, अधूनमधून येथे घडणाºया घडामोडीही लक्षवेधी असतात. देशाच्या सुरक्षेत अतिमहत्त्वाचे स्थान असलेल्या ब्रह्मोस प्रकल्पातील एका अभियंत्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी अटक झाली होती. त्यात देशभर खळबळ निर्माण करणाºया लखनौच्या (उत्तर प्रदेश) कमलेश तिवारी हत्याकांडात लखनौ तसेच स्थानिक एटीएसने सईद आसिम नामक तरुणाला अटक केली. अयोध्या निकालानंतरही काही उपद्रवी मंडळी अफवा पसरवून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशा गुप्त सूचना आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्हा पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी शांतता समितीची बैठक घेऊन शहराच्या प्रतिष्ठेला समाजकंटकाकडून गालबोट लावले जाणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली.सर्व काही सुरळीत : पोलीस आयुक्तपोलिसांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही. कोणत्या समाजकंटकाकडून तसा प्रयत्न झाला तर त्याला धडा शिकविण्यासाठी शहर पोलीस सज्ज आहेत. मात्र, तशी वेळ नागपुरात येणार नाही. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जाणारे शहर म्हणून देशात नागपूरची ख्याती आहे. येथील सर्वच जाती-धर्मातील मंडळी एकोप्याने राहतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नसल्याचा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस