शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

बदलीवरील पोलीस निरीक्षकांची सोईच्या ठाण्यांसाठी फिल्डींग

By admin | Updated: June 4, 2014 01:05 IST

दुसर्‍या जिल्ह्यात बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कार्यमुक्ती व्हावी म्हणून प्रयत्न चालविले आहे. नव्या जिल्ह्यात रुजू होणार्‍यांमध्ये पहिला क्रमांक लागावा म्हणून अनेकांची धडपड सुरू आहे.

राजकीय आश्रय : अनेक अधिकार्‍यांची कार्यमुक्तीसाठी धडपड यवतमाळ : दुसर्‍या जिल्ह्यात बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कार्यमुक्ती व्हावी म्हणून प्रयत्न चालविले आहे. नव्या  जिल्ह्यात रुजू होणार्‍यांमध्ये पहिला क्रमांक लागावा म्हणून अनेकांची धडपड सुरू आहे.महाराष्ट्र पोलीस दलात कनिष्ठ अधिकार्‍यांच्या बढत्या व बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात फौजदार, सहायक निरीक्षक,  पोलीस निरीक्षक, पदोन्नतीवरील पोलीस उपअधीक्षक आदींचा समावेश आहे. एक तर या पोलीस अधिकार्‍यांनी सोईच्या ठिकाणी  बदल्या होण्यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु अनेकांचा त्यात हिरमोड झाला. पाहिजे तो जिल्हा मिळू शकला नाही आणि आता  त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याने या पोलीस अधिकार्‍यांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याची तयारी दर्शविली.अनेक जिल्ह्यात बदलीवरील अधिकार्‍यांना सोडण्यात आले असले तरी नागपूर ग्रामीण सारखे काही अपवाद असल्याचे सांगितले  जाते. तेथील तीन अधिकार्‍यांना अद्यापही सोडले गेले नाही. नव्या जिल्ह्यात अधिकारी रुजू झाल्यास तेथील सोईच्या आणि  वरकमाईच्या जागा भरल्या जातील, अशी भीती प्रत्येकच पोलीस अधिकार्‍याला असते. त्यामुळेच तत्काळ कार्यमुक्ती व्हावी म्हणून  या अधिकार्‍यांचा प्रयत्न असतो. कार्यमुक्त न झालेले अधिकारी कासावीस झाल्याचे चित्र आहे. नव्या जिल्ह्यात बदलून आलेल्या  पोलीस अधिकार्‍यांनी सोईच्या व कमाईच्या पोलीस ठाण्यासाठी राजकीय मार्गाने फिल्डींग लावली आहे. बदलीवरील नव्या  जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीपासून ही फिल्डींग लावली जाते. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय  नेत्यांना हेरले जात आहे. पीएंमार्फत नेत्यांशी संधान बांधले जात आहे. सोईचे ठाणे मिळविण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त होणे आणि  नव्या ठिकाणी रुजू होणे यावर भर दिला जातो. काहींनी राजकीय दलाल, पोलीस खात्यातीलच वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फतच  मोर्चेबांधणी चालविली आहे. तर अनेकांनी शक्य असेल तेथे रॉयल्टीचा मार्गही निवडला असल्याचे बोलले जाते. अ दर्जाचे ठाणे  सांभाळण्याची चटक लागलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी बदलीवर नव्या जिल्ह्यातसुद्धा अ दर्जाच आपल्या हाती रहावा म्हणून  मिळेल त्या मार्गाने प्रयत्न चालविले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)