शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोलिसांची प्रतिमा बदलायची आहे

By admin | Updated: May 13, 2017 02:41 IST

आम्ही रोज एसी केबिन आणि गाडीमध्ये बसून पाहतो, त्यापलिकडे आपला समाज काय आहे, कसा आहे, ते पाहणे आवश्यक आहे.

‘मी पोलीस कमिश्नर...’ : व्यंकटेशम यांचा विश्वास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आम्ही रोज एसी केबिन आणि गाडीमध्ये बसून पाहतो, त्यापलिकडे आपला समाज काय आहे, कसा आहे, ते पाहणे आवश्यक आहे. पोलिसांवर अनेक टीका होतात. शंका उपस्थित होतात. आक्षेप घेतात. मात्र पोलिसांमध्ये सर्वच वाईट आहेत, असे नाही. अनेकजण चांगले आहेत, म्हणूनच संपूर्ण व्यवस्था टिकून आहे. परंतु तरी पोलिसांविषयी समाजात जो गैरसमज निर्माण झाला आहे ती प्रतिमा बदलण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार, असा विश्वास शहर पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी व्यक्त केला. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्राच्यावतीने ‘मी पोलीस कमिश्नर...’ या विषयावर शुक्रवारी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. शंकरनगर चौकातील बाबुराव धनवटे सभागृहात हा कार्यक्र्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर होते. अतिथी म्हणून कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, सामाजिक कार्यकर्ते रणजित मेश्राम, उद्योजक झामीन अमीन, कवी डॉ. सागर खादीवाला, लेखिका सुप्रिया अय्यर व गौरी पाटील उपस्थित होत्या. यावेळी प्रत्येक वक्त्यांनी आपण एक दिवसाचे ‘पोलीस कमिश्नर’ म्हणून विचार व्यक्त केले. त्या सर्व वक्त्यांच्या मनातील भावना ऐकल्यानंतर शहराचे खरेखुरे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, शहरात प्रथमच ‘भरोसा सेल’ सुरू करण्यात आला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भावनिक कार्यक्रम राबविला जात आहे. यातून परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजातील संपूर्ण गुन्हेगारी रोखायची असेल, तर हे केवळ पोलिसांनी होणार नाही, त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील. पोलीस म्हणजे, वेगळे नाही. तो सुद्धा समाजाचाच एक घटक आहे. नागपूर शहर राज्यात एक ‘मॉडेल’ म्हणून कसे तयार होईल. यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलिसांना सोईसुविधा मिळाव्या : सिरपूरकर निवृत्त न्यायामूर्ती व्ही. एस. सिरपूरकर म्हणाले, जोपर्यंत पोलिसांना आवश्यक सोईसुविधा मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून मोठमोठ्या अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. आज पोलिसांना राहायला घरे आहेत का, त्यांना पगार किती मिळतो, याचाही विचार झाला पाहिजे. परंतु त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. अशा स्थितीत आपण त्यांच्याकडून इंग्लंड आणि अमेरिकेतील पोलिसांप्रमाणे वागणूक मिळावी, अशी अपेक्षा करतो. ते शक्य नाही. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम तशी प्रतिष्ठा आणि सोई द्याव्या लागतील, असेही ते म्हणाले. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, पोलीस हा शब्द आठवताच मनात एक आदरभाव तयार झाला पाहिजे, परंतु सद्यस्थिती पाहता मनात भीतीचा भाव येतो. पोलीस व समाज एक दुसऱ्यांचे अविभाज्य अंग आहेत. त्यामुळे पोलीस अपयशी ठरत असेल तर ते समाजाचे सुद्धा अपयश ठरते, असेही ते म्हणाले.