शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

पोलिसांची प्रतिमा बदलायची आहे

By admin | Updated: May 13, 2017 02:41 IST

आम्ही रोज एसी केबिन आणि गाडीमध्ये बसून पाहतो, त्यापलिकडे आपला समाज काय आहे, कसा आहे, ते पाहणे आवश्यक आहे.

‘मी पोलीस कमिश्नर...’ : व्यंकटेशम यांचा विश्वास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आम्ही रोज एसी केबिन आणि गाडीमध्ये बसून पाहतो, त्यापलिकडे आपला समाज काय आहे, कसा आहे, ते पाहणे आवश्यक आहे. पोलिसांवर अनेक टीका होतात. शंका उपस्थित होतात. आक्षेप घेतात. मात्र पोलिसांमध्ये सर्वच वाईट आहेत, असे नाही. अनेकजण चांगले आहेत, म्हणूनच संपूर्ण व्यवस्था टिकून आहे. परंतु तरी पोलिसांविषयी समाजात जो गैरसमज निर्माण झाला आहे ती प्रतिमा बदलण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार, असा विश्वास शहर पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी व्यक्त केला. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्राच्यावतीने ‘मी पोलीस कमिश्नर...’ या विषयावर शुक्रवारी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. शंकरनगर चौकातील बाबुराव धनवटे सभागृहात हा कार्यक्र्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर होते. अतिथी म्हणून कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, सामाजिक कार्यकर्ते रणजित मेश्राम, उद्योजक झामीन अमीन, कवी डॉ. सागर खादीवाला, लेखिका सुप्रिया अय्यर व गौरी पाटील उपस्थित होत्या. यावेळी प्रत्येक वक्त्यांनी आपण एक दिवसाचे ‘पोलीस कमिश्नर’ म्हणून विचार व्यक्त केले. त्या सर्व वक्त्यांच्या मनातील भावना ऐकल्यानंतर शहराचे खरेखुरे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, शहरात प्रथमच ‘भरोसा सेल’ सुरू करण्यात आला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भावनिक कार्यक्रम राबविला जात आहे. यातून परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजातील संपूर्ण गुन्हेगारी रोखायची असेल, तर हे केवळ पोलिसांनी होणार नाही, त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील. पोलीस म्हणजे, वेगळे नाही. तो सुद्धा समाजाचाच एक घटक आहे. नागपूर शहर राज्यात एक ‘मॉडेल’ म्हणून कसे तयार होईल. यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलिसांना सोईसुविधा मिळाव्या : सिरपूरकर निवृत्त न्यायामूर्ती व्ही. एस. सिरपूरकर म्हणाले, जोपर्यंत पोलिसांना आवश्यक सोईसुविधा मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून मोठमोठ्या अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. आज पोलिसांना राहायला घरे आहेत का, त्यांना पगार किती मिळतो, याचाही विचार झाला पाहिजे. परंतु त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. अशा स्थितीत आपण त्यांच्याकडून इंग्लंड आणि अमेरिकेतील पोलिसांप्रमाणे वागणूक मिळावी, अशी अपेक्षा करतो. ते शक्य नाही. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम तशी प्रतिष्ठा आणि सोई द्याव्या लागतील, असेही ते म्हणाले. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, पोलीस हा शब्द आठवताच मनात एक आदरभाव तयार झाला पाहिजे, परंतु सद्यस्थिती पाहता मनात भीतीचा भाव येतो. पोलीस व समाज एक दुसऱ्यांचे अविभाज्य अंग आहेत. त्यामुळे पोलीस अपयशी ठरत असेल तर ते समाजाचे सुद्धा अपयश ठरते, असेही ते म्हणाले.